Monday, 31 January 2022

महात्मा गांधी

३० जान्युअरी १९४८
.
शुक्रवार होता त्या दिवशी. तो नेहमीसारखा सर्वसाधारण दिवस होता. 
९ सप्टेंबर १९४७रोजी कलकत्याहून आल्यापासून गांधीजींचा मुक्काम बिर्ला हाऊसमध्येच होता. 

३०जानेवारीला नेहमीप्रमाणेच गांधीजी पहाटे ३.३० वाजता उठले होते. 
प्रार्थना आणि सकाळची आन्हिकं आटोपल्यावर पुन्हा ते थोडावेळ झोपले.
त्यादिवशी सकाळी सहालाच आर के नेहरूंच्या पत्नी त्यांना भेटायला आल्या.
हळूहळू, दिवसभर येणाऱ्यांची रांगच लागणार होती. 

पाकिस्तानातले भारताचे उपायुक्त मलकानी, बीबीसीचे बॉब स्टिम्सन, गुजरातचे मुख्यमंत्री ढेबर, रसिकलाल पारेख असे बरेच लोक भेटणार होते.
संध्याकाळी ४ वाजता वल्लभभाई पटेल आणि ७ वाजता नेहरूंना भेटीसाठी बोलावलं होतं. 

लाईफ मासिकाची प्रसिद्ध छायाचित्रकर्ती मार्गारेट बूर्क व्हाईट २ वाजता मुलाखतीसाठी आली होती. 
“मला सव्वाशे वर्षं जगायला आवडेल असं तुम्ही नेहमीच म्हणत आला आहात, कोणती अशी आशा यामागे आहे?” असं तिनं विचारल्यावर गांधीजी म्हणाले, “आता मला तसं वाटत नाही. मला आता काही आशा उरली नाही. आज जगात आसपास जे घडतंय ते पाहून अशा काळोखात मला जगायचं नाहीये.”
२० जानेवारीला प्रार्थना चालू असताना बॉम्बस्फोट झाला होता. गृहमंत्री पटेलांनी तिथं एका हेड कॉन्स्टेबल आणि चार हवालदारांची नियुक्ती केली होती. संशयास्पद कुणी आढळलं तर तपासणी व्हावी असे वाढीव सुरक्षाकर्मींना आदेश होते. 

येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याची परवानगी मिळावी अशी डिआयजींनी विनंती केली. गांधीजींनी ती धुडकावून लावली. ज्यांना स्वतःसाठी सुरक्षेची गरज लागते त्यांना जगण्याचा अधिकार नाही, गांधीजी म्हटले होते. 
चार वाजता पटेल आपल्या लेकीसह आले. पाच वाजले तरी त्यांचं बोलणं संपलेलं नव्हतं. प्रार्थनेची वेळ झालेली होती. पाच वाजून दहा मिनिटाला त्यांना आठवण करून दिल्यावर ते उठले.

“उशीर झाला. हे मला आवडत नाही.” ते रागावून म्हटले.  आवारात मागे असलेल्या प्रार्थनेच्या जागी निघाले. लोकांची गर्दी झालेली होती. गांधीजी पायऱ्यांवर होते. तिथून २५ फुटांवर लाकडी चौथऱ्यावर ते जाऊन बसणार होते. 

पाच-सहा पावलं चालले असतील तेवढ्यात आडव्या आलेल्या मारेकऱ्यानं वाकून नमस्कार करण्याच्या मिषानं पिस्तुल काढलं आणि गोळ्या झाडल्या. 
ते बेरेटा एम १९३४-सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल होतं. 

फटाक्यासारखा बारका आवाज झाला. क्षणभर कुणाला काही कळलंच नाही. 
गांधीजी कोसळले आणि तिथेच गतप्राण झाले. तोंडून एक अक्षर निघालं नाही. 
प्रार्थनेनंतरच्या त्यांच्या मनोगतात गेले काही दिवस ते म्हणत होते, आजूबाजूला चाललेला राक्षसी हिंसाचार निमूटपणे पाहाणं मला शक्य नाही. देवानं आता मला उचलावं. 

ते प्रार्थनेच्या वाटेवर असतांनाच गेले. 
चालते-बोलते असतांना. 
तेव्हा घड्याळात पाच वाजून सतरा मिनिटं आणि तीस सेकंद झाले होते.

गणेश विसपुते

-----------------------------------------------------------------------------------

नरहर कुरुंदरकर (शिवरात्र : )


मदनलाल पहवाने गांधीजींवर २० जानेवारीला बॉंब टाकला, नथुरामने ३० जानेवारीला गोळी घातली. न्यायालयाने दोन्ही घटना एकाच कटाचा भाग होत्या हे सिद्ध मानले. म्हणजे बॉंब टाकून गांधी-हत्या करावी (मग त्यासाठी काही निरपराध बळी पडले तरी हरकत नाही) हा मूळ कट.

तो विफल झाला तेंव्हा गोळी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गोडसे यांचे म्हणणे आणि हा एकच कट होता या बाबी विचारात घेता मदनलाल पहवा डॉ जैन यांना १०-११ जानेवारी १९४८ रोजी भेटला त्यावेळी कट शिजलेला होता असे म्हणावे लागेल. ता. १३ जानेवारी १९४८ रोजी नथुरामने आपला विमा सौ चंपूताई यांच्या नावे केल्याचा पुरावा आहे. म्हणजे १३ जानेवारी पर्यंत गांधीजींचा खून बॉंब टाकून करावा, ते न जमल्यास त्यांना गोळी घालून मारावे, हे दोन्ही निर्णय ठरलेले दिसतात.

मदनलाल डॉ जैन यांना १० - ११ जानेवारीला भेटला त्याआधी काही दिवस कट निश्चित झालेला होता. तपशिलाने कटाची रचना करणे संपले होते. म्हणजेच गांधीहत्येचा कट पाकिस्तानला ५५ कोटी भारत सरकारने नाकारण्यापूर्वी, म्हणजेच गांधीजींनी उपोषण सुरु करण्यापूर्वी (१३ जानेवारीपूर्वी) निश्चित झाले होते. (म्हणजेच) ५५ कोटींचा विचारही गांधीहत्येचा कट रचताना कुणाच्या मनात असण्याचे काही कारण नव्हते.  

त्यावरून प्रश्न असा उदभवतो की, मग गांधीजींच्या हत्येची गरज त्या खुन्यांना का वाटली असाव.....???

----------------------------------------------------------------------------



नरहर कुरुंदरकर (शिवरात्र : )


मदनलाल पहवाने गांधीजींवर २० जानेवारीला बॉंब टाकला, नथुरामने ३० जानेवारीला गोळी घातली. न्यायालयाने दोन्ही घटना एकाच कटाचा भाग होत्या हे सिद्ध मानले. म्हणजे बॉंब टाकून गांधी-हत्या करावी (मग त्यासाठी काही निरपराध बळी पडले तरी हरकत नाही) हा मूळ कट.

तो विफल झाला तेंव्हा गोळी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गोडसे यांचे म्हणणे आणि हा एकच कट होता या बाबी विचारात घेता मदनलाल पहवा डॉ जैन यांना १०-११ जानेवारी १९४८ रोजी भेटला त्यावेळी कट शिजलेला होता असे म्हणावे लागेल. ता. १३ जानेवारी १९४८ रोजी नथुरामने आपला विमा सौ चंपूताई यांच्या नावे केल्याचा पुरावा आहे. म्हणजे १३ जानेवारी पर्यंत गांधीजींचा खून बॉंब टाकून करावा, ते न जमल्यास त्यांना गोळी घालून मारावे, हे दोन्ही निर्णय ठरलेले दिसतात.

मदनलाल डॉ जैन यांना १० - ११ जानेवारीला भेटला त्याआधी काही दिवस कट निश्चित झालेला होता. तपशिलाने कटाची रचना करणे संपले होते. म्हणजेच गांधीहत्येचा कट पाकिस्तानला ५५ कोटी भारत सरकारने नाकारण्यापूर्वी, म्हणजेच गांधीजींनी उपोषण सुरु करण्यापूर्वी (१३ जानेवारीपूर्वी) निश्चित झाले होते. (म्हणजेच) ५५ कोटींचा विचारही गांधीहत्येचा कट रचताना कुणाच्या मनात असण्याचे काही कारण नव्हते.  

त्यावरून प्रश्न असा उदभवतो की, मग गांधीजींच्या हत्येची गरज त्या खुन्यांना का वाटली असाव.....???



Sunday, 30 January 2022

जोगेंद्रनाथ मंडळ यांना116 व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 💐


💐 बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी जोगेंद्रनाथ मंडळ यांचे कार्य व कर्तृत्व. या महापुरुषांने रिपब्लिकन पक्षाचा प्रचार करतांना मृत्यूला आलिंगन दिले. 29 जानेवारी ला 116 व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 💐

✍️ उमेश गजभिये. मो. 9326887326.

बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी जोगेंद्रनाथ मंडळ या महापुरुषांचा जन्म 29 जानेवारी 1904 ला झाला. पश्चिम बंगाल मधील निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतांना 5 ऑक्टोबर 1968 ला सायंकाळी साडे सहा वाजता त्यांचे परिनिर्वाण झाले. दलित आणि गरीब जनतेच्या संरक्षणासाठी जोगेंद्रनाथ मंडळ यांनी बाबासाहेब डॉ. आंबेडकरांना भारतीय संविधान सभेवर निवडून देण्यात एक महत्वाची भूमिका निभावली आहे. हे त्यांचे एक ऐतिहासिक कार्य होते.

बाबासाहेब डॉ आंबेडकरांनी 1917 पासून भारतीय अस्पृश्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी भारताच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. नागपूर प्रदेशातील व त्यावेळच्या मध्यप्रांत च्या अस्पृश्यांच्या प्रचंड प्रयत्नामुळे नागपूरात बाबासाहेब डॉ. आंबेडकरांना अस्पृश्यांचा एकमेव नेता घोषित करण्यात आले. राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली 1920 मध्ये नागपुरात अखिल भारतीय दलित परिषदेचे झालेली आहे. या वेळेपासून बंगाल प्रांतातील अनेक अस्पृश्य दलित नेत्यांचा बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा मिळू लागला होता. बंगाल प्रांतातील ज्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या अस्पृश्योउद्गारक चळवळीत पाठिंबा दिला त्यांच्यामध्ये महापुरुष जोगेंद्रनाथ मंडळाची यांची भूमिका महत्त्वाची आहे. 

जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म आजच्या बांगलादेशच्या बोरिसल जिल्ह्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या गौरनदी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मास्तरकांडी गावात नमोशुद्र जातीच्या एका अस्पृश्य असणाऱ्या साध्या शेतकरी कुटुंबात गुरुवारी 29 जानेवारी 1904 रोजी झाला. जोगेंद्रनाथ मंडल हे समंजस होत असतांना त्यांच्या लक्षात आले की अस्पृश्य नमोशुद्र या जातीवर बंगाल प्रांतात अतोनात छळ केला जातो व त्यांना त्यांच्या हक्क व अधिकारा पासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचार याला मदत करणयासाठी, त्यांनी 1934 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवून कायद्याचा सराव सुरू केला. 1934 पासून त्यांनी अस्पृश्यांचे शोषण, पीडितांचे शोषण, शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न याकरिता जोगेंद्रनाथ यांनी अनेक न्यायालयीन खटले लढले. यामुळे जोगेंद्रनाथ बंगाल प्रांतातील अस्पृश्य जनतेत अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. जानेवारी 1936 मध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांनी गौरनदी मधील लोकत बोर्डाची निवडणूक जिंकली. त्याच वर्षी ते भाखडगंज ईशान्य जनरल सीटवरून बंगाल विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. आमदार असताना त्यांनी अस्पृश्य दलितांच्या हिताची अनेक जनकल्याणकारी कामे केली. 1938 मध्ये त्यांनी "स्वतंत्र अनुसूचित जाती पक्षाची" स्थापना केली. जोगेन्द्रनाथ मंडळ 1940 च्या दशकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जवळ आले. याचाच परिणाम म्हणून, 1940 साली कलकत्ता महानगरपालिकेत "कॉन्सिलर" म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

24 एप्रिल 1942 रोजी नजीमुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली बंगाल मंत्रिमंडळाची स्थापना झाली. यामध्ये जोगेंद्रनाथ मंडळाला सहकार आणि ग्रामीण पत वितरण मंत्री करण्यात आले. ते मंत्री असताना अनेक अस्पृश्य दलित आणि शेतकऱ्यांची कर्जे त्यांनी माफ केली. बंगाल प्रांतातील सरकारी कार्यालयांमध्ये भरतीचे मार्ग अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात प्रवेशकरिता येणारे अडथळे दूर केले. तसेच त्यांनी अस्पृश्य विध्यार्थ्यांकरिता
अनेक शासकीय वसतिगृहांची स्थापना केली.

बाबासाहेब आंबेडकरांचे अस्पृश्यांकरिता केलेल्या कार्याने प्रभावी होऊन व प्रेरित झाल्याने, मे 1943 मध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांची 'स्वतंत्र अनुसूचित जाती पार्टी' बरखास्त केली आणि बाबासाहेब डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनशी" संलग्न झाले. व बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार त्यांनी "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनशी" बंगाल प्रदेश शाखेची स्थापना केली. काही दिवसांत बंगाल प्रांतात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या" वतीने भारतभरातून 51 उमेदवार उभे केले गेले. पण एकमेव जोगेंद्रनाथ मंडळ वगळता या निवडणुकीत कोणीही यशस्वी होऊ शकले नाही.

ऑक्टोबर, 1946 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताचे अंतरिम सरकार निर्माण झाले. बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिम लीग च्या कोट्यातून भारत सरकारच्या या अंतरिम सरकारमध्ये मनोनीत केले. 4 नोव्हेंबर 1946 मध्ये त्यांनी या सरकारमध्ये "कायदा मंत्री बनवले गेले.

कायदा मंत्री म्हणून काम करत असताना जोगेंद्र मंडळाने बंगालमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींना शमवण्यासाठी अनेकांच्या भेटी घेऊन आणि बैठका आणि परिषदांच्या माध्यमातून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच त्यांनी 'हिंदू कोड बिल' अंतरिम भारतीय संसदेत ठेवण्याचाही प्रयत्न केला.
भारताच्या फाळणीबरोबरच पंजाब आणि बंगालचीही फाळणी होणार होती. जोगेंद्रनाथ मंडल यांना बंगालचे विभाजन नको होते. त्यांचा असा विश्वास होता की पूर्व बंगालमधील बहुतेक उच्च जातीचे हिंदू श्रीमंत आणि शक्तिशाली आहेत. ते पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालकडे सहज जाऊ शकतात. परंतु पूर्व बंगालमधील अस्पृश्य दलित, गरीब, शेतमजूर, मजुरी करून आणि मासे पकडून आपले उदरनिर्वाह करतात. पश्चिम बंगालमधील या सर्व निराधार गरीब दलितांचे पुनर्वसन करणे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी बंगालला अखंड राहणे आवश्यक मानले. बंगालच्या फाळणीसाठी आंदोलन सुरू होताच जोगेंद्रनाथ मंडळाने बंगालमध्ये ठिकठिकाणी बैठका आयोजित केल्या आणि बंगालची फाळणी त्यांच्या हिताची कशी नाही हे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी, बंगालच्या विभाजनाला विरोध करताना त्यांनी अशी मागणीही केली की, जर बंगालचे विभाजन झाले तर उत्तर बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्याचा सिलीगुडी विभाग, जलपाईगुडी आणि दिनाजपूर जिल्हा आणि रंगपूरचा वायव्य भाग, बिहारच्या पुनिया जिल्ह्याचा भाग आणि आसामच्या गोयलपारा जिल्ह्याबाबत अस्पृश्य दलितांसाठी स्वतंत्र राज्य देण्याची व्यवस्था असावी. हे त्यांचे म्हणणे न्यायीचीत व बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या दिशानिर्देश प्रमाणे होते. याकरिता "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनशी" बंगाल प्रदेश कार्यकारिणी त्यांच्या मदतीला होती.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तानला सार्वभौम देश म्हणून घोषित करण्यात आले. यांमध्ये बंगालची फाळणी झाली. जोगेंद्रनाथ मंडल बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्याशी सल्लामसलत करून
पाकिस्तानातील अस्पृश्य आणि हिंदूंच्या सुरक्षेसाठी त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला आणि ते पाकिस्तानात गेले. अस्पृश्यांच्या हितासाठी राजकारण करतांना जोगेंद्रनाथ मंडलांनी इतर पक्षांशी मैत्री केली. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा कधीही विश्वासघात केला नाही. याउलट त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेली त्यांची निष्ठा त्यांच्या कार्याने आणखी दृढ केली. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा वतीने, बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 च्या विधानसभा निवडणुकीत देशभर एकूण 51 ठिकाणी उमेदवार उभे केले. संयुक्त मतदार संघात हिंदूंच्या वर्चस्वामुळे अस्पृश्य दलितांचे खरे प्रतिनिधी निवडणूकित हरले आणि 'हरिजनवादी' उमेदवार काँग्रेसच्या मधून निवडून आले. अशा कठीण परिस्थितीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा वतीने बंगाल प्रांतातून केवळ जोगेंद्रनाथ मंडळ एकटे निवडून आले.

जुलै 1946 मध्ये, भारतीय संविधानाची निर्मिती करण्यासाठी संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत मतदानाचा अधिकार फक्त आमदारांना होता. बाबासाहेब डॉ. आंबेडकरांना चांगलेच माहीत होते की त्यांना कांग्रेस महाराष्ट्रातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून उभे राहल्यास सर्व शक्ती पणाला लावून जिंकू देणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक जिंकून संविधान सभेमध्ये प्रवेश घेणे आवश्यक होते. कारण भारतातील सर्व अस्पृश्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. तसेच केवळ अस्पृश्यच नव्हे तर संपूर्ण भारताला एक संघ लोकशाहीयुक्त बनवण्यासाठी संविधान सभेत निवडून येणे आवश्यक होते. ही कल्पना जोगेंद्रनाथ मंडलांना ही हीती व त्याबाबत त्यांचे बाबासाहेब आंबेडकरांशी बोलणे झाले होते. अशा वेळी, त्यागमय मूर्ती जोगेंद्रनाथ मंडलांनी बाबासाहेब आंबेडकरांना बंगाल प्रांतातून निवडणूक लढवण्यास करिता शाश्वती दिली. आणि कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांना बंगाल मधून निवडुन देऊ असे वचन दिले. जोगेंद्रनाथ मंडलांच्या वचनांचा सन्मान ठेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी बंगालच्या बोरिसल प्रदेशातून निवडणूक फॉर्म दाखल केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी जोगेंद्रनाथ यांनी प्राणपणाला लावले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतातून संविधान सभेकरिता निवडून आले.

जोगेंद्रनाथ मंडल यांना पाकिस्तान सरकारमध्ये कामगार आणि कायदा मंत्रीही केले गेले. पाकिस्तानमध्ये राहत असताना जोगेंद्रनाथ मंडल यांनी पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंच्या हिताचे अनेक कायदे केले. तसेच अस्पृश्य आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी काम केले. जोपर्यंत मोहम्मद अली जिना जिवंत होते, जिनांचा जोगेंद्रनाथ मंडल यांना काही प्रमाणात पाठिंबा होता.

मोहम्मद अली जिना यांच्या मृत्यूनंतर मौलवी कट्टरपंथीयांनी पूर्व पाकिस्तानातील ढाका येथील नयरनगंज, बोरिशल, खुलना इत्यादी भागात जातीय दंगली भडकवून लाखो अस्पृश्य आणि हिंदूंवर अत्याचार केला आणि त्यांची हत्या करण्यात आली. अस्पृश्य लोकांचा अतोनात छळ पाकिस्तानात होत आहे असे जोगेंद्रनाथ यांना दिसून आले. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात जोगेंद्रनाथ मंडळ हे एकमेव बिगर मुस्लिम मंत्री होते. पाकिस्तानात अस्पृश्य दलित हिंदूंना मुस्लिम धर्म घेण्यास बळजबरी केली जात होती. त्याकरिता अस्पृश्य हिंदूंची हत्या होत होती. त्यांची घरे जाळली जात होती. त्याची मालमत्ता लुटली जात होती. मुलींचे अपहरण केले जात होते, बलात्कार केले जात होते आणि जबरदस्तीने मुस्लिम मुलांशी लग्न केले जात होते. अस्पृश्य दलित आणि हिंदू महिलांवर मुस्लिम कट्टरपंथी या कडून बलात्कार होत होते. त्यामुळे तेथे धार्मिक दंगल सुरू होती. अश्या परिस्थितीत जोगेंद्रनाथ मंडल यांनी दंगलग्रस्त भागांना भेट देऊन दंगलखोरांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण मौलवी मूलतत्त्ववाद्यांनी दंगल भडकवण्याचे काम चालू ठेवले होते. अश्या तणावपूर्ण स्थितीत जोगेंद्रनाथ मंडलांना समजले होते की आता कट्टरपंथी मुस्लिमांसोबत राहून अस्पृश्य हिंदूंचे भविष्य सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून त्यांनी 8 ऑक्टोबर 1950 रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पाकिस्तानच्या कामगार आणि कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर जोगेंदनाथ मंडळ भारतात स्थायिक झाले. जेव्हा जोगेंद्रनाथ पाकिस्तानात होते. तेव्हापासून त्यांच्या मदतीने व साहाय्याने लाखों अस्पृश्य दलित आणि हिंदू लोक पाकिस्तान मधून पलायन जरून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून ते निर्वासित म्हणून भारतात आले होते. त्यातील बहुसंख्य हिंदू धर्मिय लोकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सरकारने भरघोष मदत केली. परंतु निर्वासित अस्पृस्य नमोशूद्र यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सरकारने पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे आजही भारतात आलेले हे बहुसंख्य निर्वासित अस्पृश्य हलाकीचे जीवन कंठीत करतांना आढळून येतात.

जोगेंद्रनाथ भारतात आल्यानंतर, पाकिस्तान मध्ये अस्पृश्य दलित आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी त्यांच्यासारखा नेता नसल्याने, अस्पृश्य दलित आणि हिंदू जे पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले होते. त्यांचा पाकिस्तानातून भारतात येण्याचा वेग आणखी वाढला. हे सर्व लोक पाकिस्तानातून भारतात आले आणि निर्वासनात आपले जीवन जगत होते. त्यांनी निर्वासित अस्पृश्य हिंदूंच्या व हिंदूंच्या वेदना जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या होत्या. त्यामुळे जोगेंद्रनाथ यांनी भारतात आल्यावर पाकिस्तान मधून भारतात आलेल्या अस्पृस्य निर्वासितांची समस्या सोडवण्याचा जीवाची बाजी लावली. 

बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. बौद्ध धर्माच्या दीक्षेमुळे धर्मांतरित बौद्धांना पूर्वीच्या अनुसूचित जातींच्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांना या यादीतून वगळण्यात आले आणि या धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातींना दिलेल्या सर्व सुविधा भारत सरकारने बंद केल्या होत्या. भारत सरकारमधील काही हिंदू नेत्यांच्या दबावामुळे भारतीय राष्ट्रपती यांनी त्यांना असणाऱ्या विशेष संविधानिक अधिकारान्वये फक्त हिंदू धर्मिय असणाऱ्या अनुसूचित जातींना लाभ घेता येईल असा कायदा 1950 केला. त्यामुळे धर्मांतरीय बौद्धांना अनुसूचित जातींच्या यादीतून वगळण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी परिनिर्वाण झाले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यापूर्वी रिपब्लिकन पक्ष हा राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा केली होती. धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे हक्क हिरावून घेतले होते. अशा कठीण परिस्थितीत रिपब्लिकन पक्षातील दलित नेते एन, शिवराज, दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे, ऍड बाबू आवळे व इतर नेत्यांनी त्यागमूर्ती जोगेंद्रनाथ मंडलांशी चर्चा केली. कारण त्यांना माहित होते की जोगेंद्रनाथ हे कायदे पंडित आहेत व केवळ जोगेंद्रनाथ मंडलच अशा कठीण परिस्थितीत मार्ग काढू शकतात व धर्मांतरित बौद्धांना न्याय देऊ शकतत्. जोगेंद्रनाथ मंडल यांनी विलंब न करता, प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी पत्रव्यवहार करून, धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातींमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूचना दिल्या. त्याचप्रमाणें जवाहरलाल नेहरू व इतर कांग्रेसी नेते यांच्यासोबत त्यावेळेस रिपब्लिकन पक्षातील प्रमुख नेत्यांनी पत्रव्यवहार केला व व्यक्तिशः वार्तालाप केला. त्यामुळे महाराष्ट्रापुरते धर्मांतरित बौद्धांना "नवबौध्द" या नावाने अनुसूचित जातीच्या सुविधा देण्याचे तोडगा काढणायत आला. परंतु उर्वरित भारतातील दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला असेल तर त्यांना अनुसूचित जातीच्या सुविधा 1990 पर्यंत मिळाल्या नाहीत.

त्यामुळे भारतात इतर राज्यातील दलित जनता बौद्ध धर्म स्वीकारल्यावर ही "नोकरीत व शैक्षणिक लाभाप्राप्तीसाठी" सर्टिफिकेट वर स्वतःच धर्म हिंदू लिहावे असा त्यांनी तोडगा काढला.

भारतात प्रबळ काँग्रेससारख्या सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रबळ विरोधी पक्ष असावा याकरिता सर्व विरोधी भारतीय प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन एक सर्वसमावेशक राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी निमंत्रण दिले व त्या राजकिय पक्षाला "रिपब्लिकन पार्टी'" असे नाव दिले. भारताकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी राजकिय पक्षाची संकल्पना जाहीर केली. त्यासाठी त्यांनी प्रख्यात साहित्यिक पी.के. अत्रे, राममनोहर लोहिया, प्रसिद्ध समाजवादी नेते एस. जोशी यांच्याशी पत्रव्यवहार केला व चर्चा केली. यात जोगेंद्रनाथ मंडल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एक विरोधी सशक्त राजकिय पक्ष असावा या बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिका संदेर्भात,1956 मध्ये या विषयावर निर्णय घेण्यासाठी बिहारच्या पाटणा येथे एक अधिवेशनही आयोजित करण्यात आले होते. या सत्राच्या वेळी अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे बाबासाहेबआंबेडकर येथे उपस्थित राहू शकले नाहीत. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे डॉ.राममोहन लोहिया होते. या अधिवेशनात बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे, हे सांगण्याची जोगेंद्रनाथ मंडळाची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. 6 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणामुळे रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेमध्ये इतर विरोधी प्रमुख नेत्यांनी त्यानंतर सहभाग घेणे टाळले.

बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष हा राजकीय पक्ष 30 सप्टेंबर 1956 ला घोषित केल्याप्रमाणे त्याचा आदर्श ठेवून, त्यांच्या दलित सहकाऱ्यांनी ज्यात प्रमुख होते दादासाहेब गायकवाड, एन. शिवराज, बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे व ऍड अवलेबाबू यांनी यासंदर्भात जोगेंद्रनाथ मंडल यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सल्ल्यानुसार 3 ऑक्टोबर 1957 रोजी नागपूरच्या विशेष अधिवेशनात 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' ची स्थापना केली. व अध्यक्ष म्हणून एन. शिवराज यांना अध्यक्ष निवडण्यात आले. याकाळात जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजकीयदृष्ट्या रिपब्लिकन पक्षाशी सहानुभूती ठेवली. परंतु त्यांना त्यावेळेस पाकिस्तानमधून आलेल्या 50 लाखांच्या वर अस्पृश्य नमोशुद्र निर्वासित जातीचे उत्थानासाठी कार्यरत राहणे हा मार्ग निवडला. अस्पृश्य नमोशुद्र जातीला भारत सरकारने अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट केले नव्हते. त्यामुळे निर्वासित म्हणून जीवन जगणाऱ्या नमोशुद्र जातींना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत. अत्यंत हलाकची गरिबीची स्थिती, त्यामुळे मुलांना पैशाअभावी शिक्षण देणे ही मोठी समस्या होती. नमोशुद्र यांना भारत सरकार अनुसूचित जातीची सवलत देत नव्हती. त्यामुळे शिक्षण व नोकरी मध्ये अडथळे निर्माण झालेले होते. मोलमजुरी करून नमोशुद्र दलितांना जीवन कंठीत जगावे लागत होते. याकरिता जोगेंद्रनाथ मंडल भारत सरकारचे प्रधानमंत्री नेहरू, इतर मंत्री यांच्याशी सतत पत्रव्यवहार करीत होते. जोगेंद्रनाथ यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झालेली होती. ते एका मित्राने त्यांना कलक्त्यात दिलेल्या टिनाच्या शेडमध्ये राहून दलितांच्या हितासाठी कार्यरत होते. 1962 पर्यंत त्यांनी नमोशुद्र जातीला अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शेकडो वेळा पत्रव्यवहार केला. या कार्यात त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी सहकार्य केले.

1957 नंतर जोगेंद्रनाथ मंडल यांच्याशी सतत संपर्कात असणाऱ्या रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर खोब्रागडे व बी पी मौर्य यांची विनंतीला मान्य करून, प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाला सहकार्य करण्याचे वचन दिले. 1962 मध्ये दिल्लीतील एका प्रचंड गर्दीच्या सभेत जोगेंद्रनाथ मंडल यांनी रिपब्लिकन पक्षात अधिकृतपणे प्रवेश घेतला. रिपब्लिकन पक्षाशी त्यांचे हे नाते मृत्यू होईपर्यंत होते. 1963 मध्ये, जोगेंद्रनाथ मंडल यांनी पश्चिम बंगालमध्ये 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' अधिकृत शाखा स्थापना केली. 1962 पासून जोगेंद्रनाथ हे सतत रिपब्लिकन पक्ष भारतात वाढवण्यासाठी प्रचारार्थ दिवस रात्र कार्यरत होते.
जोगेन्द्रनाथ मंडल यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्यापासून त्यांनी संपूर्ण भारतात रिपब्लिकन पक्षाच्या प्रचारासाठी सतत काम केले. शेवटी, रिपब्लिकन पक्षाचा निवडणुकीत प्रचार करताना 5 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांचे निधन झाले. रिपब्लिकन पक्षाचे नेते मौर्य यांच्या सोबत त्यांनी दिल्ली व उत्तरप्रदेशात अनेक सभा प्रचारार्थ राबवल्या. तसेच त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातील अनेक शहरात 1963 नंतर 1968 पर्यंत कार्य केले आहे.

जोगेंद्रनाथ मंडल हे खरे आंबेडकरवादी म्हणून जगले आणि आंबेडकरी रिपब्लिकन म्हणून कार्यरत असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू होत असतांना ते रिपब्लिकन पक्षासाठी प्रचार करत होते. ज्याप्रमाणे एक सैनिक आपल्या देशाच्या सुरक्षेच्या लढाईत आपल्या प्राणाची आहुती देतो. त्याचप्रमाणे जोगेंद्रनाथ मंडल यांनी रिपब्लिकन पक्षाचा प्रचार करताना आपले प्राण सोडले. आज त्यागमूर्ती जोगेंद्रनाथ मंडल हे आंबेडकरी रिपब्लिकन म्हणून आपल्या कार्याच्या आणि विचारांच्या रूपाने आपल्यामध्ये जिवंत आहेत. आज 5 ऑक्टोबर 2021ला, 53 व्या जयंती व स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

दिनांक : 5 ऑक्टोबर 2021 *(संशोधित 28 जानेवारी 2022)*

उमेश गजभिये *(आंबेडकरी बौद्ध चळवळ व रिपब्लिकन बुद्धिजीवी संघ)*
जयभीम जयभारत
नमोबुद्धाय

✍️ उमेश गजभिये. मो. 9326887326.

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
Join Us🔛@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
  *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
            *★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Wednesday, 26 January 2022

आम्ही भारताचे लोक- प्रा. हरी नरके


आम्ही भारताचे लोक- 

प्रजासत्ताक भारताचे संविधान लिहून पुर्ण झाल्यावर त्याच्या प्रारंभी कोणता शब्द असावा यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल विचार करून ठरवले की ह्या संविधानाचे सार्वभौम, सर्वोच्च उर्जाकेंद्र लोक=प्रजा असल्यानं
"आम्ही भारताचे लोक " अशी प्रास्ताविकेची [सरनाम्याची] सुरूवात करायची.
घटना परिषदेत त्यांनी त्याबद्दलची सविस्तर भुमिका मांडली.

मात्र मालवियांना "इन दि नेम ऑफ गॉड" अशी सुरुवात हवी होती तर मौलाना हसरत मोहनींना "अल्लाह के नाम" अशी सुरूवात हवी होती.
कोणाला प्रारंभी राम तर कोणाला गणपती हवा होता. असंख्य सुधारणा सुचवल्या गेल्या.

बाबासाहेबांनी त्या सर्व नाकारल्या.
ते म्हणाले, " तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. हे देवलोकाचे संविधान नाहीये. हे लोकशाहीचे संविधान आहे. त्यामुळे "आम्ही भारताचे लोक " अशीच प्रास्ताविकेची [सरनाम्याची] सुरूवात करण्यावर मी ठाम आहे. हवे तर मतदान घ्या.

अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी विचित्र भुमिका घेतली. ज्यांना देव हवा त्यांनी देवाला तर ज्यांना लोक हवेत त्यांनी लोकांना मते द्यावीत असे पर्याय त्यांनी दिले.
घटना सभेचे सभासद महाचतुर.
लोकांना नाराज केले तर उद्या मतं मागायला कोणाकडं जायचं?
देवाला नाराज केलं तरी असून अडचण नसून खोळंबा.

भारतातील सर्व धर्माचे देव विरूद्ध 33 कोटी लोक असा जंगी सामना झाला.
2/3 सभासद तटस्थ राहिले.
देवाला 42 तर लोकांना 68 मतं पडली.
म्हणुन हे लोकांचे राज्य आहे. प्रजासत्ताक आहे.

ज्यांचे ज्यांचे मतदार यादीत नाव आहे ते सर्व देशाच्या सात बाराचे मालक म्हणजेच देशाचे मालक!
तर मालक लोकहो, अभिनंदन आणि शुभेच्छा!

-प्रा.हरी नरके

Monday, 24 January 2022

सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी गांधीजींना कळली, तेव्हा सायंकाळच्या प्रार्थनेची वेळ होती. बातमी कळल्याबरोबर त्यांनी आपली प्रार्थना आटोपती घेतली व रडवेले होत म्हणाले, 'तो झेंडा जरा उतरवा, माझा मुलगा गेला.'


सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी गांधीजींना कळली, तेव्हा सायंकाळच्या प्रार्थनेची वेळ होती. बातमी कळल्याबरोबर त्यांनी आपली प्रार्थना आटोपती घेतली व रडवेले होत म्हणाले, 'तो झेंडा जरा उतरवा, माझा मुलगा गेला.'

महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अनेक गोष्टी मुद्दाम चुकीच्या पद्धतीने पसरविल्या गेल्या. असे संगितले गेले की सुभाषचंद्र बोस हे जेव्हा १९३९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून विजयी झाले, तेव्हा गांधीजींनी हा माझा पराभव आहे असे सांगितले. परंतु स्वार्थांध राजकारणी व मीच किती शहाणा - किती महान इतिहासकार, हे दाखविणाऱ्या लेखकांनी त्यांचं मूळ वक्तव्य व लिखाण चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडले. खरे काय होते? तर ३१ जानेवारी १९३९ ला बारडोली येथे गांधीजींनी दिलेला हा संदेश जो यंग इंडियाच्या ४ फेब्रुवारी १९३९ च्या अंकात छापला आहे, तो असा- 'मै सुभाष बाबू की विजय से खुश हुं... लेकीन मौलाना अबुल कलाम आझाद द्वारा अपना नाम वापस लेने के बाद भी डॉ. पट्टाभी को चुनाव से हटनेकी सलाह मैने दी थी, इसलिए यह हार ऊनसे जादा मेरी है.' गांधी पुढे म्हणतात, 'इस हार से मै खुश हुं... सुभाष बाबू अब उन लोगों की कृपा के सहारे अध्यक्ष नही बने है, बल्की चुनाव जितकर अध्यक्ष बने है. ऊनकी राय मे उनका कार्यक्रम और उनकी नीती दोनो अत्यंत अग्रगामी है, अल्पमत के लोग उसकी सफलता ही चाहेंगे.'
आता यावरुन अभ्यासक हे समजू शकतात की किती खोटारडा प्रचार केला जात आहे! आता काही महत्त्वाच्या घटना पाहा म्हणजे सत्य लक्षात येईल.

ज्या वेळी सुभाष बाबूंना ब्रिटिश सरकारने अटक केली, त्यावेळी त्यांनी एक लेख २६ मे १९२७ रोजी 'यंग इंडिया'मध्ये लिहिला, ज्यात ते लिहितात - 'इस दुख:द मामले से भी आगर कोई सांत्वना की चीज ढूंढ निकालना चाहे, तो उसे एक चीज जरूर मिल जायेगी और वह यह कि अंतिम क्षण तक श्रीयुत सुभाषचंद्र बोस सरकार द्वारा समय-समय पर रखी गई अपमान भरी शर्तो को बडी जंवामर्दी के साथ इन्कार करते रहे. अब हमे आशा और प्रार्थना करनी चाहीए कि परमात्मा उन्हे फिर स्वस्थ करे और वे चिरकाल तक अपने देश की सेवा करते रहे.'
पुन्हा एकदा जेव्हा सुभाषबाबूना अटक करण्यात आली, त्यावेळी ९ जुलै १९४० रोजी सेवाग्राममध्ये असताना लिहितात- 'सुभाषबाबू जैसे महान व्यक्ति की गिरफ्तारी कोई मामुली बात नही है. लेकीन सुभाष बाबूने अपनी लडाई की योजना काफी सोच-समझकर और हिम्मत के साथ सामने रखी है. वे मानते है कि ऊनका तरीका सबसे अच्छा है... उन्होने मुझे बडी आत्मीयता से कहा कि जो कुछ कार्यसमिती नही कर पाई, वे वह सब करके दिखा देंगे. वे विलंब से ऊब चुके थे. मैने उनसे कहा कि अगर आपकी योजना के फलस्वरूप मेरे जीवन-काल मे स्वराज्य मिला तो आपको बधाई का सबसे पहला तार मेरी और से ही मिलेगा. आप अपना संघर्ष चला रहे होंगे उस दौरान अगर मै आपके तरीके का कायल हो गया तो मै पुरे दिल से अपने नेता के रूप मे आपका स्वागत करूंगा और आपकी सेना मे भरती हो जाऊंगा.'

सुभाष बाबू यांची प्रशंसा करताना गांधीजींनी लिहिले आहे, जर या भारत देशाला हुकूमशहा देण्याची वेळ आलीच तर पहिला हुकूमशहा म्हणून मी सुभाषचंद्रांचीच निवड करीन. त्याच बरोबर २३ ऑगस्ट १९४६ रोजी जेव्हा सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी त्यांना कळली, तेव्हा ते उरळी कांचन येथील आश्रमात होते व त्या वेळी सायंकाळच्या प्रार्थनेची वेळ होती. शेजारी तिरंगी झेंड्याचे निशाण फडकविले जायचे. बातमी कळल्याबरोबर त्यांनी आपली प्रार्थना आटोपती घेतली व रडवेले होत ते म्हणाले, 'तो झेंडा जरा उतरवा, माझा मुलगा गेला.' २४ फेब्रुवारी १९४६ च्या 'हरिजन' या वृत्तपत्रात गांधीजी लिहितात- 'आझाद हिंद फौज का जादू हमपर छा गया है. नेताजी का नाम सारे देश मे गुंज रहा है. वे अनन्य देशभक्त है. ऊनकी बहादूरी उनके सारे कामों मे चमक रही है. ऊनका उद्देश महान था... नेताजी और ऊनकी फौज हमे जो सबक सिखाती है, वह तो त्याग का, जाति-पाति के भेद रहित एकता का और अनुशासन का सबक है. अगर ऊनके प्रति हमारी भक्ति समझदारी की और विवेकपूर्ण होगी तो हम ऊनके इन तीनो गुणो को पुरी तरह अपनाएंगे.'
२७ एप्रिल १९४७ रोजी आझाद हिंद फौजेच्या जवानांशी बोलताना गांधीजी म्हणतात- 'सुभाष बाबू तो मेरे पुत्र के समान थे. उनके और मेरे विचारों मे भले ही अंतर रहा हो, लेकिन उनकी कार्यशक्ति और देशप्रेम के लिए मेरा सिर ऊनके सामने झुकता है.' त्यांच्या निधनानंतर देखील गांधीजी सुभाष बाबू यांचा सुभाष असा कधीही एकेरी उल्लेख करीत नसत, तर ते 'नेताजी' असा आदराने उल्लेख करीत असत.

आता थोडे आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही संदेश पूर्णपणे समजून घेऊ जो त्यांनी गांधीजींच्या जन्मदिनी २ ऑक्टोबर १९४३ रोजी बँकॉक रेडियोवरुन प्रसारित केला होता- '…. मन की शून्यता के ऐसे ही क्षणो मे महात्मा गांधी का उदय हुआ. वे लाए अपने साथ असहयोग का, सत्याग्रह का एक अभिनव, अनोखा तरीका. ऐसा लगा मानो उन्हे विधाता ने ही स्वतंत्रता का मार्ग दिखाने के लिए भेजा था. क्षण भर मे, स्वत: ही सारा देश उनके साथ हो गया. हर भारतीय का चेहरा आत्मविश्वास और आशा से दमक गया. अंतिम विजय की आशा फिर सामने थी. आने वाले बीस वर्षो तक (१९२०-२१ मध्ये गांधीजींचा खऱ्या अर्थाने काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला होता, तेव्हापासून पुढील २० वर्षे) महात्मा गांधी ने भारत की मुक्ति के लिए काम किया और उनके साथ काम किया भारत की जनता ने. ऐसा कहने मे जरा भी अतिशयोक्ति नही होगी कि यदि १९२० मे गांधीजी आगे नही आते तो शायद आज भी भारत वैसा ही असहाय बना रहता. भारत की स्वतंत्रता के लिए उनकी सेवांए अनन्य, अतुल्य रही है. कोई अकेला व्यक्ति उन परिस्थितीयों मे एक जीवन मे उतना कुछ नही कर सकता था.'
दि. ६ जुलै १९४४ रोजी सुभाषबाबूनी प्रत्यक्ष गांधीजींना उद्देशून रेडियोवर एक भाषण केले, त्यात त्यांनी गांधीजींचा उल्लेख 'राष्ट्रपिता' असा केला. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या लढ्याला गांधीजींचे आशीर्वाद मागितले. नेताजींसारखा एक महान सेनानायक जर त्यांचे गांधीजीशी मनभेद असते (मतभेद जरुर होते, पण मनभेद कधीच नव्हते, एकमेकांबद्दल मनात वैरभाव कधीच नव्हता) तर त्यांनी कधीच असे उद्गार काढले नसते.

परंतु भेटण्याची इच्छा व्यक्त केली असताना व त्यासाठी स्वत:चे सहाय्यक पाठवले असताना ज्यांना सुभाषबाबूनी साधी भेटण्याची वेळही दिली नाही, अशाच लोकांनी गांधीजी व सुभाषबाबू यांच्या संदर्भात अनेक अफवा निर्माण करुन केवळ द्वेष पेरण्याचेच काम केले.

नाहीच गांधीजी समजून घ्यायचा तरी काही हरकत नाही, पण नेताजींनी मानवतेसाठी जो महान त्याग, धार्मिक एकता व खऱ्या अनुशासनाचा जो पाठ आम्हाला दिला आहे, तेवढा जरी आम्ही शिकू शकलो तरी पुरेसे आहे!

Sunday, 23 January 2022

आज नेताजींचा जन्मदिन...या लढवय्या सेनानीला मनःपूर्वक सल्यूट !

नेताजी सुभाषबाबूंनी देशाला
जय हिंद 'असा तेजस्वी नारा दिला.

आणि आता छत्रपतीचां हर हर महादेव
या ही जयघोषा ऐवजी
आणि सुभाष बाबू यांच्या
जयहिंद ' या घोषा ऐवजी नियोजनपूर्वक 
जय श्रीराम 
लोकांच्या मुखी प्रस्थापित 
झालाय!

हा प्रयत्नच स्पष्टपणे दर्शवितो आहे की,
महापुरुषांचे विचारच नव्हे तर जनतेला ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या
घोषणा ही गायब केल्या जात आहेत.

एके प्रसंगी तर सुभाषबाबूंनी काँग्रेस कार्यकारिणीत ठराव करून, काँग्रेसजनांना संघ वा हिंदू महासभेशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्यास मज्जाव केला होता !
कारण, हिंदूत्ववाद्यांच्या प्रत्येक चालीला ते ओळखत होते.

आणि आज हिंदूत्ववादी मोदींना सुभाषबाबूंप्रती आत्मीयता वाटू लागत्येय ! ती देखील निर्भेळ नाहीय. त्यामागेही, सुभाषबाबूंना स्वातंत्र्यलढ्यात प्रधानत्व देऊन नेहरूंना दुय्यम स्थानी ठेवण्याचा हीनकस विचारच आहे.

त्यामुळं, दोन्हीही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना काही फरक पडत नाही... कारण, दोघेही आमच्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील 
दीपस्तंभच आहेत !

आज नेताजींचा जन्मदिन...
या लढवय्या सेनानीला मनःपूर्वक सल्यूट !

मदन पाटील
[23/01, 9:48 pm] +91 97644 37884: 16डिसेंबर 1938, काँग्रेस
अध्यक्ष नेताजी सुभाषबाबू ने
एक प्रस्ताव पारित कर,
काँग्रेस के किसी भी
सदस्य को हिंदुमहासभा
और मुस्लिम लीग के 
सदस्य बनने पर
पाबंदी लगाई दी थी l
नेताजी संघ और हिंदुमहासभा विरोधी थे l

Referance :
Hindu Mahasabha in
Colonial North India
Prabhu Bapu Pg 40.

सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?

१. पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर सुभाषबाबूंनी स्वतःच्याच कार्यकारिणीवर टीका केली. 'काॅग्रेसची कार्यकारिणी इंग्रजधार्जिणी आहे' अशी टीका खुद्द काॅग्रेस अध्यक्षच करू लागल्यानं मोठी विचित्र स्थिती निर्माण झाली. कार्यकारिणीवर विश्वास नसेल तर सुभाषबाबूंनी आपल्या मनाप्रमाणे स्वतंत्र कार्यकारिणी निवडावी अशी रास्त सूचना गांधीजींनी केली. याचा अर्थ सुभाषबाबूंनी 'असहकार' असा घेतला. वस्तुतः तो स्वयंनिर्णयाचा अधिकार होता.  

२. जो शब्द नेहरूविरोधकांना अजिबात आवडत नाही, 'समाजवाद'  त्याच शब्दांनी सुभाषबाबू -नेहरू जोडले गेले होते. काॅग्रेसमध्ये बराच काळ सुभाषबाबू-नेहरू  एक गट आणि मोतीलाल नेहरू,  सरदार पटेल- गांधी असा दुसरा गट होता. आता इथं हिंदुत्ववाद्यांना एकतर पटेलाना नाकारावं लागतं नाही तर बाबूंना! पण हा इतिहासच त्यांना माहित नसल्यानं ते दोघांनाही तितक्याच राजकीय आत्मियतेनं कवटाळतात. 

३.आझाद हिंद सेनेच्या बाजूनं लढण्यासाठी नेहरूंनी पुन्हा एकवार काळा कोट अंगावर चढवला होता. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांचा सन्मान स्वातंत्र्यानंतर नेहरूंनीच केला. सुभाषबाबू गेल्यानंतर त्यांच्या कुटूंबाची देखभाल व्हावी म्हणून पेन्शन नेहरूंनीच पुढाकार घेऊन सुरू केली.  

४. सुभाषबाबूंनी 'सहा महिन्यात स्वातंत्र्य" असा अशक्य आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात चेष्टेचा विषय बनू शकणारा ठराव पारित केला तेव्हा नेहरूंनी 'तुम्ही थोर देशभक्त आहात पण फार उतावीळ आहात'असं पत्र लिहीलं. त्या पत्रातून हृद्य संबंध सिद्ध होतो.

५. स्वातंत्र्यासाठी कोणाचीही मदत घेण्यास बाबू उतावीळ होते. हिटलर, मुसोलिनी, अगदी कोणीही! अशा हुकूमशहांच्या मदतीनं येणारं स्वातंत्र्यही देशाला वारंवार हुकूमशाहीकडे नेईल म्हणून गांधी-पटेल-सरदारांचा त्यास कट्टर विरोध होता. 

६. काॅग्रेसमधून बाहेर पडल्यावर बाबू परदेशी गेले. तिथल्या पत्रकारांनी विचारलं की गांधीजींच्या आणि तुमच्या मतभेदांबद्दल काय सांगाल? बाबू ताबडतोब उत्तरले "आमच्या संस्कॄतीत बाप लेकाचं भांडण लोकांसमोर उघड करत नसतात!' 

या इतिहासाचं ज्यांना आकलन करणं शक्य आहे त्यांनी करा.  

मर्जी है आपकी, आखिर सर है आपका!

आनंद शितोळे सर

Saturday, 22 January 2022

हिंदुमहासभा आणि सुभाषबाबू

हिंदुमहासभा आणि सुभाषबाबू 
.........................................

Chittaranjan Bhat 
साभार...

काँग्रेसचे पूर्वाध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांची परवा जयंती आहे. आज पंतप्रधानांनी नेताजींचा भव्य पुतळा इंडिया गेटजवळ उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. हे उत्तम झाले. असो. त्यानिमित्त त्यांची एक आठवण ―

श्यामाप्रसाद मुखर्जींनी हिंदू महासभा जॉईन केल्यानंतर एके दिवशी सुभाषचंद्र बोस त्यांना भेटायला गेले. दोघेही बंगालचे असल्याने त्यांच्यात आधीपासूनच चांगला परिचय असणे स्वाभाविक होते.

सुभाष बाबू मुखर्जींना म्हणाले, 'बंगालमध्ये हिंदू महासभेची राजकीय फळी निर्माण करायचा विचार देखील करू नका. आणि जर असं घडलंच तर ती निर्माण व्हायच्या आधीच तोडण्यासाठी मी प्रसंगी बळाचा देखील वापर करेन.'

श्यामाप्रसाद मुखर्जींनी हा प्रसंग त्यांच्या डायरीमध्ये जशास तसा नमूद केला आहे.

त्यानंतर सुभाषचंद्र बोसांनी त्यांचे हे शब्द तडीस देखील नेले. परंतु या प्रकरणी त्यांना फार काही बळाचा वापर वगैरे करावा लागला नाही. त्याकाळचे हिंदू महासभेचे आणखी एक नेते बलराज मधोक यांनी सांगितलं की, 'सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या समर्थकांनी त्यावेळी धाकदपटशाहीने महासभेचे कार्यक्रम उधळून लावायचे प्रसंगी महासभेच्या कार्यकर्त्यांना झोडपून काढायचं अशा योजना बनवल्या. हे मुखर्जींना अजिबात रुचलं नाही आणि त्यांनी याबाबत ऍक्शन घेण्यासाठी सहकाऱ्यांची एक मिटिंग बोलावली. त्या मिटिंग मध्ये मुखर्जी बोलायला उठलेच होते की एक दगड भिरकन आला आणि त्यांच्या डोक्यात बसला. मुखर्जी रक्तबंबाळ झाले!'

सुभाषबाबूंनी बंगालमध्ये हिंदू महासभेची वासलात चालू व्हायच्या आधीच लावून टाकली होती.

---------

सद्यकाळात देशाला अशा नेताजींची आणि नेताजींच्या अशा जाज्वल्य विचारांची फार गरज आहे.

नेताजींना आदरांजली!  
जय हिंद!!

Friday, 21 January 2022

मार्टिन ल्यूथर किंग

जहाँ सियासत धार्मिक मसलों को शांत करे ओ देश महान होता हैं l
जहाँ सियासत खुद धार्मिक मसलों को पैदा करे.....
समझो की देश को गलत लोग
चला रहे हैं l

- मार्टिन ल्यूथर किंग

जंग-ए-आझादी में पठाणोंका किरदार'भारतरत्न' खान अब्दुल गफा़र खान- एक लढवैय्या पठाण..


'सरहद्द गांधी' म्हणजेच भारतरत्न खान अब्दुल गफ़ारखान यांच्या स्मृतीदिनानिमित्त लेख 
'जंग-ए-आझादी में पठाणोंका किरदार
'भारतरत्न' खान अब्दुल गफा़र खान- एक लढवैय्या पठाण... 

भारतातील सत्ताधिशांच्या बेबंद आश्रयामुळे भारतातील बहुसंख्य जनतेस आज हिंदु राष्ट्राची स्वप्ने पडत आहेत. आजच्या कांही कथित देशभक्तांनी हा भारत देश केवळ हिंदुचा असून इतर धर्मिय दुय्यम नागरीक आहेत, असा दुष्प्रचार सुरू केला आहे. पण या भारत भुमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हिंदू सोबतच अनेक मुस्लिम, शिख धर्मियांनी आपले रक्त सांडले आहे, कारावास भोगला आहे, त्याग केला आहे याची जाणीवही अनेकांना नाही. 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व त्यागले अशा अनेक महान भारतीय सुपुत्रापैकी एक ठळक नाव म्हणजे 'भारतरत्न' खान अब्दुल गफार खान. पेशावरच्या पठाण कुटूंबात जन्मलेले अब्दुल गफार खान यांचे कार्य समस्त भारतीयांनी त्यांच्या बद्दल सदैव ऋणी नि कृतज्ञ रहावे असेच आहे! प्रश्न हा आहे की, आजचा 'न्यू इंडिया' त्यांच्याबद्दल कृतज्ञ न राहता कृतघ्न का झाला आहे?  

भारतरत्न खान अब्दुल गफार खान उपाख्य सरहद गांधी यांचा जन्म पेशावर येथील एका पठाण कुटुंबात ६ फेब्रुवारी १८९० रोजी झाला. पठाण म्हणजे क्षात्रतेज असणारा एक लढवय्या भारतीय समाज. या लढवय्या समाजाने भारतीय स्वातंत्र्यात अतिशय अतुलनीय असे योगदान दिले आहे. पारतंत्र्यात असताना अनेक पठाणांना ब्रिटिशांनी कारावासात टाकले आणि अनेकांना फाशीची सजाही सुनावली. पण पठाण समुदाय डगमगला नाही, तो सतत लढत राहीला. हा समाज लढवय्या तर होताच शिवाय बदललेल्या जगातील परिस्थितीची जाण आणि भान त्याबरेबरच चातुर्य देखील त्यांच्याकडे होते. 

खान अब्दुल गफार खान यांचे आजोबा अब्दुल्ला खान पठाण देखील असेच एक लढवय्ये वीर होते. त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात संघर्ष केला. लढाऊ वृत्ती खान अब्दुल गफार खान यांनी त्यांच्या आजोबा कडून शिकली. परंतु त्यांनी अध्यात्मिकता त्यांचे वडील बैरम खान आणि महात्मा गांधी यांच्याकडून प्राप्त केली. खान अब्दुल गफार खान यांनी गांधीजींचे सत्य आणि अहिंसा हे तत्त्वज्ञान स्वीकारले. कारण ते इस्लामचा मूळ अर्थ सत्य,शांतता आणि अहिंसा असून तो गांधीच्या विचारांशी साम्य असणारा आहे असं मानत होते. 

अब्दुल गफार यांचे वडिल बैरम खान यांची अशी इच्छा होती की, अब्दुल गफार खान यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे. म्हणून त्यांनी त्यांना मिशनरी स्कूल मध्ये भरती केले. त्यावेळी अनेक सनातनी पठाणांनी याचा विरोध केला. परंतु हा विरोध झुगारून अब्दुल गफार खान यांनी मोठ्या हिमतीने आधुनिक आधुनिक शिक्षण घेतले. ही बाब आजही अनेक भारतीय आणि पाकीस्तानी कट्टर मुस्लिम समुदायासाठी खूप मार्गदर्शक अशी आहे.धर्माचरण हे आधुनिक शिक्षण आणि आधुनिक विचार यातील अडथळा बनता कामा नये, हा विचार अब्दुल गफार खान आणि त्यांच्या वडिलांच्या कृतीतून अंगीकारायला हवा हे महत्वाचे! 

मिशनरी स्कूल मधून शिक्षण घेतल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अलीगढ हे शहर गाठले. तिथे त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून या देशातील हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारलेली 'गंगा जमनी तहजीब' हीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकेल या विचारातून त्यांनी समाजसेवा करण्यासाठी पुन्हा आपल्या गावी पेशावरला जाऊन समाजसेवा करायची आणि हिंदु मुस्लिम ऐक्याचा हा संदेश सर्वत्र पोचवायचा हे ठरवले.  

पेशावरमध्ये १९१९ मध्ये 'रौलेट मार्शल लॉ' लागू झाला होता.याच काळात खान अब्दुल गफार खान यांनी गांधींचे शिष्यत्व पत्करले आणि खुदाई खिदमतगार या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संघटनेचे उद्दिष्ट इश्वराची सेवा हीच जनसेवा या तत्वावर आधारीत होते. गांधींनी ज्या प्रमाणे हिंदुंच्या आध्यत्मिक जाणीवांना प्रबळ करत राजकीय लढा उभा केला. त्याच आधारावर खान यांनी हा प्रयत्न खुदाई खिदमतगार संघटनेच्या माध्यमातून केला. या संघटनेची प्रतिज्ञा खूप बोलकी आहे. ती राजकीय इस्लामपेक्षा अंहिसा अध्यात्मिक तत्वावर आधारलेली होती. "मी कधीही हिंसा करणार नाही, माझ्यावर अन्याय करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबाबत मनात राग धरून मी त्याच्याशी सुडभावनेने वागणार नाही आणि त्याच्या व्यक्तीस मी माफ करेन" अशी प्रतिज्ञा खुदाई खिदमतगार या संघटनेत घेतली जात असे. बदला घेण्याच्या वृत्तीचे म्हणून प्रसिद्ध असणा-या पठाण समुदयात असा विचार मांडणे, तो रूजवणे आणि लोकांना तो शंभर वर्षापुर्वी अंगिकारायला लावणे ही खरोखरच क्रांतीकारी बाब होती. 

'मार्शल लॉ' च्या त्यांनी विरोधात आंदोलन केले म्हणून ब्रिटिशांनी खान अब्दुल गफार खान यांना अटक करून त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला भरला. या खटल्यात त्यांना सहा महिन्याची सजा झाली. तेंव्हापासून खाऩ अब्दुल गफार खान यांची कारकिर्द गांधीजीचे अनुयायी अशी घडली. टिळक आणि गांधी यांना आपला नेता मानणा-या खान यांनी कॉग्रेसच्या सर्व आंदोलनात सहभाग नोंदवत हिंदु मुस्लिम ऐक्याचा नवा अध्याय घडवला. सी.आर. दास, नेताजी बोस, मोतीलाल नेहरू, पट्टाभी सितरामय्या, हसरत मोहानी आदी नेत्यांबरोबर खान यांनी कार्य केले. 

नेहरू रिपोर्ट आणि पुर्ण स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर झालेल्या आंदोलनात त्यांनी एक कॉग्रेस सदस्य या स्वरूपात भाग घेतला. कॉग्रेसच्या सर्वच नेत्यांसोबत त्यांना नंतर १९३० साली अब्दुल गफार खान यांना पुन्हा कारावास घडला. हा कारावास अब्दुल गफार खान यांना त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारा ठरला! या कारावासाच्या काळात त्यांनी कुराणचे पठण करण्याबरोबरच बरोबर शीखांचा धर्मग्रंथ 'गुरु ग्रंथ साहिब' आणि 'भगवद्गीता' यांचेही वाचन केले. कुराण गुरुग्रंथसाहीब आणि भगवद्गीता यांच्या एकत्रित वाचनातून आणि चिंतनातून खान अब्दुल गफार खान यांचे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे एक प्रमुख शिपाई म्हणून व्यक्तिमत्त्व घडले. आजवर घेतलेल्या हिंदु मुस्लिम ऐक्याच्या भुमिकेस एक तत्वचिंतनपर आधार लाभला. त्यांनी त्यांच्या अनुयायांना याच प्रकारे हिंदू-मुस्लिम ऐक्याची ओळख आणि अपरीहार्यता समजून सांगीतली. त्यावेळी त्यांच्यासोबत कारागृहात असणारे अनेक मुस्लीम कैदी त्यांच्या या शिकवणीने प्रभावित झाले आणि त्यांनी महात्मा गांधींचे नेतृत्व मान्य करून देशातील हिंदू मुस्लिम ऐक्य हेच ब्रिटिश अन बरोबरच्या लढाईत प्रमुख आधार असेल हत्यार असेल अशी भूमिका मांडली. पुढे १९३१ साली  
झालेल्या गांधी-आयर्विन करारानंतर खान अब्दुल गफार खान यांची कारागृहातून सुटका झाली. तेव्हापासून खान अब्दुल गफार खान यांनी महात्मा गांधी यांचे शिष्यत्व पत्करून देशातील सामाजिक कार्यात स्वताला झोकून दिले. महात्मा गांधी यांचे शिष्यत्व खान अब्दुल गफार खान यांनी स्विकारल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू डॉ. जब्बार खान देखील या सामाजिक कार्यात सामील झाले. 

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत या दोन्ही बंधूंनी योगदान दिल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना स्थानबद्ध केले आणि पुढे १९३४ मधे त्यांची सुटका झाल्यानंतर खान अब्दुल गफार खान आणि त्यांचे बंधू डॉक्टर खान दोघेही वर्धा येथील गांधीजींच्या आश्रमात राहू लागले. त्यानंतर त्यांनी भारतात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रमुख नेते म्हणून भारतभर दौरे केले ज्यामुळे नंतरच्या कालखंडात ब्रिटिशांच्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मोठे समर्थन मिळाले. या दोन्ही बंधूंनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग नोंदवला आणि त्यांना पुन्हा अटक झाली. 
त्यानंतर १९४५ साली त्यांची सुटका झाली. 

खान अब्दुल गफार खान हिंदू-मुस्लीम ऐक्याचे आणि त्याचबरोबर अखंड भारताचे खरेखुरे समर्थक! अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी अखंड भारत हेच स्वप्न उराशी बाळगले होते.फाळणीच्या प्रस्तावास विरोध करणारे चारच नेते होते स्वतः महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण! एका बाजूला बॅ. जीना मुस्लिम लीगच्या माध्यमातून धर्माच्या आधारावर राजकीय उद्दिष्टे साध्य करू इच्छित होते. त्याच वेळी भारतातील हिंदुत्ववादी सुद्धा बॅ. जीना प्रमाणेच हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. अब्दुल गफार खान यांनी बॅ.जीना यांच्या मुस्लिम लीगला आणि सावरकरांच्या हिंदू महासभेला काँग्रेसच्या साथीने कडाडून विरोध केला. वायव्य सरहद्द प्रांतात १९३७ च्या निवडणुकात मुस्लिम लीगला एकही जागा मिळाली नव्हती. परंतु १९४० साली पाकिस्तान निर्मितीची घोषणा केल्यावर मात्र मुस्लिम लीगला वायव्य सरहद्द प्रांत शिरकाव करता आला आणि त्यांना १९४० सालातील निवडणुकात १७ जागा मिळाल्या. परंतु तरीही ३० जागा मिळवून खान अब्दुल गफार खान यांचे बंधू डॉ.जब्बार खान यांच्या नेतृत्वाखाली ते सत्तेत राहीले.

अखंड भारताच्या फाळणीचा प्रस्ताव स्वीकारल्याबद्दल तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावर 'सत्तेसाठी फाळणी स्वीकारली' असा आरोपही त्यांनी केला. पण ते त्यांच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या आणि अंहिसेच्या तत्त्वापासून मागे हटले नाहीत. फाळणीच्या काळात वायव्य सरहद्द प्रांतात झालेल्या हिंसे दरम्यान खान अब्दुल गफार खान यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अनेक हिंदूंचे आणि शिखांचे प्राण वाचवले.

देशाची फाळणी हा त्यांच्यासाठी खूप मोठा आघात होता. कारण स्वातंत्र्यपूर्व कालखंडात खान अब्दुल गफार खान यांनी सातत्याने बॅरिस्टर महंमद अली जिना आणि त्यांचा पक्ष मुस्लिम यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु फाळणीनंतर 'पख्तुनीस्तान' म्हणजेच वायव्य दिशेकडील अखंड भारताचा प्रांत हा स्वाभाविकपणे पाकिस्तानात सामील करणे अपरिहार्य बनले. त्यामुळे खान अब्दुल गफार खान यांच्याबद्दल पाकिस्तानच्या सत्ताधिशांना कायमस्वरूपी तिरस्कार वाटत राहिला. फाळणी बद्दल अनेक मतमतांतरे असली तरीही, हा भारत देश अखंड राहील आणि हिंदू मुस्लिम ऐक्य टिकेल, या हेतूने तन्मयतेने काम करणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांना फाळणी ही खूप मोठा धोका या स्वरूपात अनुभवायला मिळाली. 

खान अब्दुल गफार खान १९६९ गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारतात आले. तेव्हा त्यांनी भारतीय संसदेला उद्देशून केलेल्या भाषणात 'भारत ज्याप्रमाणे बुद्ध यांना विसरला त्याच प्रमाणे तो गांधींनाही विसरत आहे' अशी खंत व्यक्त केली होती. भारताच्या फाळणीस स्विकारल्या बद्दल त्यांनी भारतातील नेत्यांना उद्देशून उद्विग्न पणे असे वक्तव्यही केले की, "तुम्ही फाळणी करून, आम्हाला कोल्हे लांडगे यांच्या हवाली केले आहे". त्यांचे हे वक्तव्य तंतोतंत खरे होते. अखेरपर्यंत त्यांनी कधीही फाऴणी स्वीकारली नाही. कारण पाकिस्तानची निर्मिती आणि पाकिस्तानच्या निर्मितीचे उद्दिष्ट याच्याशी खान अब्दुल गफार खान यांनी कधीही समर्थन केले नव्हते. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानमधे पाकिस्तान पासून 'स्वतंत्र पख्तुनीस्थान' निर्माण करण्याचे आंदोलन चालू ठेवले. ज्यास यश मिळालेच नाही.  

भारत हा आपला देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीवर उभा राहिला. पण त्यात आपण खान अब्दुल गफार खान यांना सामील करून घेऊ शकलो नाही ही खुप मोठी खंत आजच्या भारतासाठी सदोदित सलनारी आहे. 

अखिल भारतीय काँग्रेस बद्दल आणि अखंड भारत भारताबद्दल सातत्याने सकारात्मक भूमिका घेणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांचा पाकिस्तान मध्ये छळ झाला हे वेगळे सांगायला नको. कारण पाकिस्तानी सत्ताधीशांनी त्यांना अनेक वर्ष तुरूंगात टाकले आणि आयुष्यातील काही काळ त्यांना अफगाणिस्तानमध्ये अतिशय कठीण परिस्थितीत व्यतीत करावा लागला. 

गांधी जन्मशताब्दी सोहळ्यानंतर ते १९८५ साली पुन्हा भारतात आले. कारण होते काँग्रेसचा शतकपूर्ती महोत्सव. यावेळीही ते भारतात आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते. भारतीय जनतेने त्यांना सतत भारताचा सुपुत्र मानून प्रेम केले. त्यांचे आत्मचरित्र ' My life and Strugle' हे त्यांची उद्विग्ता आणि भारतीयांबद्दलची आत्मियता समजण्यासाठी मुळातून वाचण्यासारखे आहे. भारतातून परतल्यावर दोनच वर्षांनी १९८७ साली पाकिस्तानी सरकारने त्यांना पेशावरमध्ये स्थानबद्ध केले आणि तिथेच २० जानेवारी १९८८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ऐतिहासिक पुरावे नाहीत पण असे म्हटले जाते की त्यांना भारतात दफन व्हायचे होते पण त्यांच्या अनुयायांनी त्यांना अफगाणिस्तानातील जलालाबाद तिथे दफन केले!  

भारत सरकारने १९८८ साली त्यांना 'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. भारतरत्न हा सन्मान मिळवणाऱ्या अनेक महान नेत्यांच्या यादीत खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानी नागरिक आहेत याचा अनेक आजकालच्या कथित देशभक्तांना पत्ताही नसेल!

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे एक प्रमुख नेते, अखंड भारताचे कडवे समर्थक आणि गांधीजींचे शिष्य म्हणून जगाला खान अब्दुल गफार खान यांची आजची ओळख आहे. गांधीजींना पण 'राष्ट्रपिता' म्हणतो अगदी त्याच धर्तीवर खान अब्दुल गफार खान यांना भारतीय जनतेने तेच मानाचे स्थान दिले आणि त्यांचा 'सरहद्द गांधी' असा त्यांचा सन्मान केला. पण तरीही खान अब्दुल गफार खान यांनी मांडलेली खंत आणि अखंड भारताची त्यांची मागणी वा ईच्छा, ही प्रत्येक भारतीयासाठी सदैव एक मोठा प्रश्न म्हणून सर्व भारतीयांना सलत राहील. 

© राज कुलकर्णी.

{ हा लेख बीड येथे ६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या 'जंग-ए-आझादी में पठाणोंका किरदार ' या ग्रंथात प्रकाशित झालेला आहे}

Tuesday, 18 January 2022

थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन व त्याच्या ड्रायव्हरची गोष्ट


ही गोष्ट थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन व त्याच्या ड्रायव्हरची आहे.नवीन शोधांवर जनतेत जाऊन आइन्स्टाइन खूप सोपं बोलत असे. ड्रायव्हर अल्पशिक्षित असला तरी बुद्धीमान होता. तो प्रत्येक भाषण मन लावून ऐकायचा. एकदा तो म्हणाला हा सापेक्षता सिद्धांत मीसुद्धा लोकांना समजावून देऊ शकेन.
आइन्स्टाइनने त्याला भाषणाची संधी दयायचे ठरवले. तो कसा दिसतो हे माहीत नसलेल्या गावाहून पोस्टाने निमंत्रण आले.

त्या गावाला जाताना त्याने द्रायव्हरला मागे बसवले व तो स्वतः द्रायव्हरच्या जागी बसला.
संयोजकांनी गाडीत मागे बसलेल्या द्रायव्हरला मंचावर नेले, सत्कार, परिचय झाला.भाषणही उत्तम झाले. नन्तर प्रश्नोत्तरे झाली.पूर्वी विचारली गेलेली 'प्रश्न-उत्तरे' माहीत असल्याने द्रायव्हरने व्यवस्थित उत्तरे दिली.

कार्यक्रम संपणार तोच एकाने नवीनच प्रश्न विचारला. द्रायव्हर हजरजबाबीपणे व कमालीच्या शांतपणे म्हणाला "शाब्बास, प्रश्न छानच आहे. पण इतका सोप्पाय की याचे उत्तर तर माझा द्रायव्हरसुद्धा देऊ शकतो. ये रे द्रायव्हर मंचावर नी दे उत्तर. "

आइन्स्टाइन स्टेजवर आला, त्याने उत्तर दिले. लोक खुश झाले.

Moral of the story is....
पण तो किमान द्रायव्हर तरी होता!
: प्रा. हरी नरके

Monday, 17 January 2022

शहीद रोहित वेमुला यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ..!


आठवतय ना कोण आहे ..?

युनिव्हर्सिटी टॉपर , स्कॉलरशिप थांबवली होती , हॉस्टेल मधून काढलं होत, रस्त्यावर झोपायला भाग पाडलं होतं .

याची चूक फक्त एवढीच होती की तो दलित होता आणि सगळ्यांना फाट्यावर मारत "जय भीम" म्हणायचा .!

शहीद रोहित वेमुला यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ..!

💐💐💐

Sunday, 16 January 2022

महापराक्रमी,रणधुरंदर,स्वराज्यरक्षक सह्याद्रीचा अजिंक्य छावा छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिना निमित्त मानाचा मुजरा.


सह्याद्रीच्या दश दिशांतून
पराक्रमाचा अंगार फुलला होता.
एकाच वेळी नऊ आघाड्यावंर 
ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज मुघलं...
तू समोर भिडला होतास.

द्वेषाने तुझ्या तेजाच्या
बदनामीची मोहीम जारी झाली.
मृत्यू नंतर ही तुझ्या
जारीच राहिली ती.....

काय काय सांगावं!
रायगडला जेव्हा जाग येते,
येथे ओशाळला मृत्यू
ते थोरातांची कमळा.....

पण अखेर तुझ्या शौर्याची
चरित्र्याची विद्वतेची ज्योत
काही विझली नाहीचं!

जागु लागला इतिहास महाराष्ट्राचा 
साक्ष घेऊन गडकोटाची 
मराठी कडेकपाराची.
नवी पिढी सरसावली 
तुझ्या इतिहासाला
नव्याने पुकारण्यासाठी.
सत्याचे अवतरण झालेच!

शौर्याने उसळणारा तू नरसिंह 
तू ग्रंथकर्ता विद्वान होतास.
आणि चरित्र्याचा धनी होतास 
तू मृत्युला आलिंगन देणारा
सिंहाचा छावा होतास.
उघड्या मैदानात शत्रूला
अधिक भयचकीत करणारा
महावीर होतास.

स्वराज्याच्या धाकल्या धन्याला
राज्याभिषेक दिनाच्या 
निमित्ताने
मानाचा मुजरा...

शाम lllll

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य काबीज करण्याच्या हेतूने धूर्त मंत्र्यांनी डाव आखला.

छोट्या राजारामांना नामधारी राजा बनवून स्वराज्याची सुत्रे आपल्या हाती घेण्याचा डाव. हा कावेबाजपणा अण्णाजी दत्तो,राहूजी सोमनाथ, मोरो पिंगळे, बाळाजी आवजी ह्या स्वराज्यद्रोही मंत्र्यांनी पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला.

पण सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यानी ह्या मंत्र्यानच्या मुसक्या आवळून शंभूराजां पुढे हजर केले आणि ह्या असल्या
स्वराज्यद्रोहींच्या व शत्रू च्या छाताडावर पाय ठेवून शंभू राजे छत्रपती जहाले. 

समस्त बहुजन शिवशंभू प्रेमी जनतेला छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेकाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!

महापराक्रमी,रणधुरंदर,स्वराज्यरक्षक सह्याद्रीचा अजिंक्य छावा छत्रपती संभाजी महाराजांना राज्याभिषेक दिना निमित्त मानाचा मुजरा.

आंतरराष्ट्रीयकीर्तीचे लेखक व पद्मश्री महाकवी पॅथर नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏

माय मराठी म्हणजे संत नामदेवा
पासून ते पँथर नामदेव ढसाळा
पर्यंतचा प्रवास!


"पुरोगाम्यांचे बुरखे कधीच फाटलेत,
 छिनाल जातीच्या नावावर समदेच इथं वाटलेत...!

'जीवाचं नाव लवडा ठेवून जगनार्यांनी खुशाल जगावं,
मी तसा जगनार नाही....!

आंतरराष्ट्रीयकीर्तीचे लेखक व पद्मश्री महाकवी 
पॅथर नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏

धर्मप्रेमी आणि अधर्मप्रेमी !

धर्मप्रेमी आणि अधर्मप्रेमी !
________________________________

अमेरिका दौर्‍यावरून विवेकानंद परत आल्यावर महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितले, 'हा माणूस शूद्र आहे. समुद्रप्रवास करून आलाय. प्रायश्चित्त देऊनही याला शुद्ध करता येणार नाही !'

दक्षिणेश्वरांच्या मंदिराच्या पुजार्‍यांनी त्यांना पुजा करू न देता बाहेरचा रस्ता दाखवला.

भारतात पाय ठेवताच लोकांनी विवेकानंदांना मुंडन करायला लावले. कफनी घालायला लावली. या त्रासातून, तणावातून त्यांचे मधुमेहासारखे आजार बळावले.

बेलूर येथील मठ स्थापनेसाठी देशातील एकाही धनिकाने वा संस्थानिकांने त्यांना मदत केली नाही. सारे पैसे त्यांच्या हेनरिटा मुल्लर या लंडनस्थित मैत्रीणीने दिले.

बेलूर मठाचे सभासद होताना धर्म, पंथ, जात, लिंग आणि राष्ट्रीयत्व विचारात घेतले जाणार नव्हते. सर्व माणसे एकसमान आहेत, असे बेलूर मठ मानत होता.

विवेकानंदांच्या मृत्यूपश्चात कोलकात्याच्या कोणत्याही वृत्तपत्राने त्यांच्या मृत्यूची साधी बातमीही छापली नाही. शोकसभेत सामील होण्यास कोलकता उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी नकार दिला.

( श्री दत्तप्रसाद दाभोळकरांच्या 'विवेकानंदांचा धर्म' ह्या लोकसत्ता मधील लेखातून  )

Wednesday, 12 January 2022

डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जी का एक संक्षिप्त परिचय

डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जी का एक संक्षिप्त परिचय 

1. भारत के सबसे जादा पढे लिखे व्यक्ति 
 2. सबसे ज्यादा किताब लिखने वाले 
 3. सबसे तेज स्पीड से ज्यादा टाईप करने वाले
 4. सबसे ज्यादा शब्द टाईप करने वाले
 5. सबसे ज्यादा आंदोलन करें
 6. महिला अधिकार के लिए, 'हिंदू कोड बिल', पास ना होने पर संसद में, मंत्रीपद का इस्तीफा देने वाले 
 7. दलित, पिछडो के हक़ को दिलाने वाले
 8. हिन्दू धर्म के ग्रन्थ मनुस्मर्ति को, चोराहे पर जलाने वाले 
 9. जातिवाद को समाप्त करने के लिए, ब्राह्मण स्त्री से विवाह करने वाले  10. गरीब मज़लूमो के हको के लिए अपने 4 बच्चे कुर्बान करने वाले 
 11. 2 लाख किताबो को पढ़कर याद रखने वाले
 12. भारत के सविधान निर्माता 
 13. पूना पैक्ट लिखा 
 14. मूक नायक पत्रिका निकाली 
 15. बहिष्कृत समाचार पत्र निकाला 
 16. सबसे तेज दोनों हाथों से लिखने वाले 
 17. ग़ांधी जी को जीवन दान देने वाले 
 18. सबसे काबिल बैरिस्टर *
 19. मुम्बई के सेठ के बेटे को फर्जी, मुक़दमे से बरी कराने वाले 
 20. योग करने वाले 
 21. सबसे ईमानदार एवं प्रामाणिक
 22. 18 से 20 घंटे पढ़ने वाले 
 23. सरदार पटेल को obc का मतलब समझने वाले 
 24. स्कूल के बहार बैठकर और अपमान सहकर उच्च शिक्षा पाने वाले 
 25. हम सबकी भलाई के लिए अपनी पत्नी रमाबाई को खोने वाले.
 दिल से आदरणिय जयभीम 
 ===================
.
 डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जी का
 एक संक्षिप्त परिचय 
````````
  डॉ. बाबासाहब आंबेडकर जी, 9 भाषाएँ जानते थे 
 1. मराठी (मातृभाषा) 
 2. हिन्दी 
 3. संस्कृत 
 4. गुजराती 
 5. अंग्रेज़ी 
 6. पारसी 
 7. जर्मन 
 8. फ्रेंच 
 9. पाली 

उन्होंने पाली व्याकरण और शब्दको  (डिक्शनरी) भी लिखी थी, 
 जो महाराष्ट्र सरकार ने,
 "Dr.Babasaheb Ambedkar Writing and Speeches, Vol.16 में प्रकाशित की हैं."

डॉ. बाबासाहब आंबेडकर जी ने,
 संसद में पेश किए हुए विधेयक 
````````
 1. महार वेतन बिल 
 2. हिन्दू कोड बिल 
 3. जनप्रतिनिधि बिल 
 4. खेती बिल 
 5. मंत्रीओं का वेतन बिल 
 6. मजदूरों के लिए वेतन (सैलरी) बिल 
 7. रोजगार विनिमय सेवा 
 8. पेंशन बिल 
 9. भविष्य निर्वाह निधी (पी.एफ्.) 

 बाबासाहब के सत्याग्रह (आंदोलन)
````````
 1. महाड आंदोलन 20/3/1927
 2. मोहाली (धुले) आंदोलन 12/2/1939
 3. अंबादेवी मंदिर आंदोलन 26/7/1927
 4. पुणे कौन्सिल आंदोलन 4/6/1946
 5. पर्वती आंदोलन 22/9/1929
 6. नागपूर आंदोलन 3/9/1946
 7. कालाराम मंदिर आंदोलन 2/3/1930
 8. लखनौ आंदोलन 2/3/1947
 9. मुखेड का आंदोलन 23/9/1931

.डॉ. बाबासाहब आंबेडकर द्वारा , स्थापित सामाजिक संघटन 
 ```````
 1. बहिष्कृत हितकारिणी सभा : 20 जुलै 1924 
 2. समता सैनिक दल - 3 मार्च 1927 

.राजनीतिक संघटन :
``````
 1. स्वतंत्र मजदूर पार्टी - 16 अगस्त 1936
 2. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन- 19 जुलै 1942

.धार्मिक संघटन :
```
 1. भारतीय बौद्ध महासभा : 4 मई 1955

.शैक्षणिक संघटन :
````
 1. डिप्रेस क्लास एज्युकेशन सोसायटी :
 * 14 जून 1928 *
 2. पीपल्स एज्युकेशन सोसायटी :8 जुलै 1945 *
 3. सिद्धार्थ काॅलेज, मुंबई- 20 जून 1946
 4. मिलींद काॅलेज, औरंगाबाद- 1 जून 1950

.अखबार, पत्रिकाएँ
`````
 1. मूकनायक- 31 जनवरी 1920 *
 2. बहिष्कृत भारत- 3 अप्रैल 1927 *
 3. समता- 29 जून 1928 *
 4  जनता- 24 नवंबर 1930 *
 5. प्रबुद्ध भारत- 4 फरवरी 1956 *
```````
. डॉ. बाबासाहब आंबेडकर जी ने,
 अपने जिवन में विभिन्न विषयों पर ,
 527 से ज्यादा भाषण दिए 
````````
. डॉ. बाबासाहब आंबेडकर जी को,
 प्राप्त सम्मान :
````````
 1. भारतरत्न 
 2.The Greatest Man in the World
 * : Columbia University :
 3.The Universe Maker 
 * : Oxford University :
 4.The Greatest Indian  :
 * : CNN IBN & History Tv :
 5. THE SYMBOL OF KNOWLAGE.

डॉ. बाबासाहब आंबेडकर जी इनकी, निजी किताबें (उनके पास थी)
```````
 1. अंग्रेजी साहित्य- 1300 किताबें
 2. राजनिती- 3,000 किताबें
 3. युद्धशास्त्र- 300 किताबें
 4. अर्थशास्त्र- 1100 किताबें
 5. इतिहास- 2,600 किताबें
 6. धर्म- 2000 किताबें
 7. कानून- 5,000 किताबें
 8. संस्कृत- 200 किताबें
 9. मराठी- 800 किताबें
 10. हिन्दी- 500 किताबें
 11. तत्वज्ञान (फिलाॅसाफी)- 600 किताबें
 12. रिपोर्ट- 1,000
 13. संदर्भ साहित्य (रेफरेंस बुक्स) - 400 किताबें
 14. पत्र और भाषण- 600
 15. जिवनीयाँ (बायोग्राफी)- 1200
 16  एनसाक्लोपिडिया ऑफ ब्रिटेनिका-1 से  29 खंड *
 17.  एनसाक्लोपिडिया ऑफ सोशल सायंस-  1 से 15 खंड *
 18. कैथाॅलिक एनसाक्लोपिडिया- 1 से 12 खंड
 19. एनसाक्लोपिडिया ऑफ एज्युकेशन 
 20  हिस्टोरियन्स् हिस्ट्री ऑफ दि वर्ल्ड-  1 से 25 खंड
 21. दिल्ली में रखी गई किताबें- बुद्ध धम्म, पालि साहित्य, मराठी साहित्य- 2000 किताबें
 22. बाकी विषयों की 2305 किताबें बाबासाहब जब अमेरिका से भारत, लौट आए तब एक बोट दुर्घटना में उनकी,
.सैंकडो किताबें समंदर मे डूबी।

.डाॕ. बाबासाहब आंबेडकर जी
````````
 1. महान समाजशास्त्री
 2. महान अर्थशास्त्री
 3  संविधान शिल्पी
 4. आधुनिक भारत के मसिहा
 5. इतिहास के ज्ञाता और रचियाता
 6. मानवंशशास्त्र के ज्ञाता
 7. तत्वज्ञानी (फिलाॅसाॅफर)
 8. दलितों के और महिला अधिकारों के मसिहा
 9. कानून के ज्ञाता (कानून के विशेषज्ञ)
 10. मानवाधिकार के संरक्षक
 11. महान लेखक
 12  पत्रकार
 13. संशोधक
 14. पाली साहित्य के महान अभ्यासक  :अध्ययनकर्ता :
 15. बौध्द साहित्य के अध्ययनकर्ता
 16. भारत के पहले कानून मंत्री
 17. मजदूरों के मसिहा
 18. महान राजनितीज्ञ
 19. विज्ञानवादी सोच के समर्थक
 20. संस्कृत और हिन्दू साहित्य के गहन अध्ययनकर्ता थे *

 डॉ. बाबासाहब आंबेडकर जी का 
 बायोडाटा और कुछ खास विशेषताएँ :
````````
 1. पाणी के लिए आंदोलन करनेवाले विश्व के पहल महापुरुष 

 2. लंदन विश्वविद्यालय के पुरे लाईब्ररी के किताबों की छानबीन कर उसकी जानकारी रखनेवाले एकमात्र महामानव *

 3. लंदन विश्वविद्यालय के 200 छात्रों में  नंबर 1 का छात्र होने का सम्मान प्राप्त होनेवाले पहले भारतीय 

 4  विश्व के छह विद्वानों में से एक *

 5. विश्व में सबसे अधिक पुतले बाबासाहब आंबेडकर जी के हैं

 6. लंदन विश्वविद्यालय मे डी.एस्.सी. यह उपाधी पानेवाले पहले और आखिरी भारतीय 

 7. लंदन विश्वविद्यालय का 8 साल का पाठ्यक्रम 3 सालों मे पूरा करनेवाले महामानव  डॉ. बाबासाहब आंबेडकर जी के वजह से ही भारत में "रिजर्व बैंक" की स्थापना हुईं

डॉ. बाबासाहब आंबेडकर जी ने अपने डाॅक्टर ऑफ सायंस के लिए ' दि प्राॅब्लेम ऑफ रूपी' यह शोध प्रबंध भी लिखा था। 


 Dr. BHIMRAO AMBEDKAR  (1891 TO 1956)
  =======================

 * B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D.,
 * L.L.D.,
 * D.Litt., Barrister-at-La w.
 * B.A.(Bombay University)
 * Bachelor of Arts,
 * MA.(Columbia university)
 * Master Of Arts,
 * M.Sc.( London School of
 * Economics) 
 * Master Of Science,
 * Ph.D. (Columbia University)
 * Doctor of philosophy ,
 * D.Sc.( London School of
 * Economics) 
 * Doctor of Science ,
 * L.L.D.(Columbia University)
 * Doctor of Laws ,
 * D.Litt.( Osmania University)
 * Doctor of Literature,
 * Barrister-at-La w (Gray's Inn,
 * London)
 * law qualification for a lawyer in
 * royal court of England.
 * Elementary Education, 1902
 * Satara,
 * Maharashtra *
 * Matriculation, 1907,
 * Elphinstone High
 * School, Bombay Persian etc.,
 * Inter 1909, Elphinston e
 * College, Bombay
 * Persian and English
 * B.A, 1912 Jan, Elphinstone
 * College, Bombay,
 * University of Bombay,
 * Economics & Political
 * Science
 * M.A 2-6-1915 Faculty of Political
 * Science,
 * Columbia University, New York,
 * Main- Economics
 * Ancillaries-Soc iology, History
 * Philosophy,
 * Anthropology, Politics
 * Ph.D 1917 Faculty of Political
 * Science,
 * Columbia University, New York,
 * 'The National Divident of India - 
 * A Historical and
 * Analytical Study'
 * M.Sc 1921 June London School
 * of Economics, London
 * 'Provincial Decentralizatio n of
 * Imperial Finance in British India'
 * Barrister-at- Law 30-9-1920
 * Gray's Inn, London Law
 * D.Sc 1923 Nov. London School
 * of Economics, London 
 * 'The Problem of the Rupee - 
 * Its origin and its solution' was
 * accepted for the degree of
 * D.Sc. (Economics).
 * L.L.D (Honoris Causa) 5-6-1952
 * Columbia University, New York For
 * HIS achievements,
 * Leadership and authoring the
 * constitution of India
 * D.Litt (Honoris Causa)
 * 12-1-1953 Osmania
 * University, Hyderabad For HIS
 * achievements,
 * Leadership and writing the
 * constitution of India !
  संकलन : बी. वव्ही. एम  राजस्थान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

अद्वितीय शिष्य #आनंद; बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान जाणून घ्या

अद्वितीय शिष्य #आनंद; 
बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान जाणून घ्या!
--->
या जगात असंख्य गुरू होऊन गेले पण भगवान बुद्धांसारखे गुरु या जगात झालेले नाहीत. तसेच अनेक गुरूंचे अनेक शिष्य होऊन गेले परंतु आनंद सारखा बुद्धांचा शिष्य या जगामध्ये झालेला नाही. बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान अद्वितीय आहे. तो होता म्हणून पहिली धर्मसंगिती यशस्वी झाली आणि बुद्धवचने सुरक्षित झाली. तो होता म्हणून स्रियांना संघात प्रवेश मिळाला. तो होता म्हणून भगवान बुद्ध यांचा सहाय्यक झाला आणि उतारवयात त्यांची काळजी घेतली.

आनंद हा बुद्धांचा चुलत भाऊ. जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले आणि ते पहिल्यांदा कपिलवस्तुला आले, तेव्हा आनंदने त्यांना पाहिले. त्यांचा उपदेश ऐकला आणि तो त्यांचा निस्सीम शिष्य झाला. भगवान बुद्ध जेंव्हा ५५ वर्षाचे झाले तेव्हा त्यांना एका सहाय्यकाची गरज भासू लागली. आणि त्यावेळेला शिष्य आनंदाने भगवान बुद्ध यांचा सहाय्यक होण्याचे मान्य केले. आणि आनंद भगवान बुद्धांच्या अखेरच्या क्षणापर्यंत सोबत राहिला. त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द, प्रत्येक वाक्य न वाक्य आपल्या स्मरणात ठेवले आणि म्हणून आज आपल्याला बुद्धगाथा शुद्ध स्वरूपात वाचायला मिळत आहेत. 

त्याकाळी स्त्रियांवर सामाजिक बंधने असताना त्यांना संघात सामील करून घेणेसाठी आनंदने बुद्धांचे मन वळविले. तसेच बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सैरभैर न होता संघाची धुरा काहीकाळ सांभाळली.आनंद यांना १२० वर्षांचे आयुष्यमान लाभले. पहिल्या धर्मसंगिती अगोदर अर्हत झाल्यावर स्मरणशक्तीच्या जोरावर ८४००० गाथांना अनुमोदन दिले. बुद्धांचा चालता बोलता इतिहास जगापुढे आणला. आयुष्याच्या अखेरीस मगध राज्यातून वैशालीकडे जाताना गंगा नदीच्या ठिकाणी त्यांचे परिनिर्वाण झाले. नदीच्या दोन्ही बाजूस त्यांचे स्तूप होते, पण गेल्या दोन हजार वर्षांत अनेकवेळा नदीने पात्र बदलून त्यांचे स्तूपही आपल्यात सामावून घेतले. 

चिनी प्रवासी भिक्खू फाइयांन आणि हुएंत्संग यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात वर्णिलेल्या आनंदच्या स्तुपस्थळांवरून अलीकडेच काही पुरातत्ववेत्त्यांनी शोध घेतला तेव्हा वैशालीजवळील चेचर गावातील नदीकिनारी भरपूर पुरातन अवशेष आढळले. व इथेच आनंद यांचे स्तूप असावेत असे मानण्यात आले.आज या गावात खाजगी चेचर संग्रहालय असून असंख्य प्राप्त पुरातन वस्तू तेथे दर्शनार्थ ठेवल्या आहेत. नदीकिनारी नूतनीकरण केलेल्या देवळाच्या गाभाऱ्यात भगवान बुद्ध यांची मूर्ती असून खरे सुखकर्ते आणि दुःखहर्ते म्हणून भक्तिभावाने पुजले जात आहेत. आज आनंद यांचा स्तूप भारतात अस्तित्वात नसला तरी म्यानमार देश आनंद यांना विसरला नाही. या देशात बगान इथे आनंद पॅगोडा हे सर्वात मोठे विहार आहे. व दररोज येथे असंख्य भाविक, पर्यटक भेट देतात. 

त्रिपिटकाचा शिल्पकार, उत्कृष्ठ संघचालक, उत्तम वक्ता, असलेल्या जगतगुरू बुद्धांच्या या शिष्यास माझे 
नम्र वंदन.! !

धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा वाढवून घेण्यास वाव नाही. ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔹धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा वाढवून घेण्यास वाव नाही.🔹

"जुलमांतून अस्पृश्यांची सुटका कशी करून घेता येईल हा अस्पृश्य जनतेपुढे मोठा प्रश्न आहे. या जुलमांतून सुटका करून घेण्यास सरकारची विशेष मदत होईल असे आम्हास वाटत नाही. सरकार हे स्पृश्य हिंदुंच्या ताब्यात नसले तरी त्यांच्या धोरणाने वागणारे आहे. स्पृश्य हिंदू समाज अस्पृश्यांना सुखाने, ऐष आरामाने नंदू देत नसेल तर त्यांनी परधर्माचा अवलंब करावा हेच बरे. अस्पृश्यांना स्पृश्य लोक कांकणभर देखील इतमामाने राहू देत नाहीत याचे कारण हिंदू धर्मात अस्पृश्यांचा दर्जा खालचाआहे. दर्जा वाटल्याखेरीज अस्पृश्यांना स्पृश्याप्रमाणे वागू दिले जाणार नाही आणि धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांना आपला दर्जा वाढवून घेण्याचे मार्ग नाही."!!!
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१९, पान नं.२९९)
    दि.४ नोव्हेंबर १९२७  रोजी 'बहिष्कृत भारत' मध्ये प्रकाशित झालेला बाबासाहेबांचा लेख.
🔹संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.

अमेरिका दौर्‍यावरून विवेकानंद परत आल्यावर महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितले, 'हा माणूस शूद्र आहे. समुद्रप्रवास करून आलाय. प्रायश्चित्त देऊनही याला शुद्ध करता येणार नाही !'

अमेरिका दौर्‍यावरून विवेकानंद परत आल्यावर महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितले, 'हा माणूस शूद्र आहे. समुद्रप्रवास करून आलाय. प्रायश्चित्त देऊनही याला शुद्ध करता येणार नाही !'

दक्षिणेश्वरांच्या मंदिराच्या पुजार्‍यांनी त्यांना पुजा करू न देता बाहेरचा रस्ता दाखवला.

भारतात पाय ठेवताच लोकांनी विवेकानंदांना मुंडन करायला लावले. कफनी घालायला लावली. या त्रासातून, तणावातून त्यांचे मधुमेहासारखे आजार बळावले.

बेलूर येथील मठ स्थापनेसाठी देशातील एकाही धनिकाने वा संस्थानिकांने त्यांना मदत केली नाही. सारे पैसे त्यांच्या हेनरिटा मुल्लर या लंडनस्थित मैत्रीणीने दिले.

बेलूर मठाचे सभासद होताना धर्म, पंथ, जात, लिंग आणि राष्ट्रीयत्व विचारात घेतले जाणार नव्हते. सर्व माणसे एकसमान आहेत, असे बेलूर मठ मानत होता.

विवेकानंदांच्या मृत्यूपश्चात कोलकात्याच्या कोणत्याही वृत्तपत्राने त्यांच्या मृत्यूची साधी बातमीही छापली नाही. शोकसभेत शामिल होण्यास कोलकता उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी नकार दिला.

( श्री दत्तप्रसाद दाभोळकरांच्या 'विवेकानंदांचा धर्म' ह्या लोकसत्ता मधिल लेखातून  )

हिंदूत्ववाद्याना विवेकानंदाचा हा धर्म मान्य आहे का ?'विवेकानंदांचा ‘धर्म!'विवेकानंदांनी हे आमंत्रण कसे मिळवले, हा एक विलक्षण प्रकार आहे.

हिंदूत्ववाद्याना विवेकानंदाचा हा धर्म मान्य आहे का ?

'विवेकानंदांचा ‘धर्म!'

विवेकानंदांनी हे आमंत्रण कसे मिळवले, हा एक विलक्षण प्रकार आहे.
जीवन, विकास व सुख-शांती या सगळ्यांसाठी आवश्यक अशी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे विचार व आचार यांचे स्वातंत्र्य. ते जर नसेल तर राष्ट्र, मानव किंवा मानववंश यांचे पतन अटळ आहे. इतरांचे नुकसान होत नसेल, तर आपण काय खावे, कोणते कपडे घालावेत व कोणाशी विवाह करावा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला हवा!

*सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात फडकावला. हे आपल्या मनावर वज्रलेप करण्यात आलंय. परंतु हे ‘शत प्रतिशत’ खोटं आहे.* सर्वधर्म परिषद ही त्यावेळच्या अमेरिकेतील सर्वांत मोठी घटना होती. तीन वर्षे त्याची तयारी सुरू होती. मात्र, हिंदू धर्माने आपला प्रतिनिधी तेथे पाठवलेला नव्हता. परिषद यवनी भाषेत होती आणि वाटेत हिंदू धर्म बुडविणारा समुद्रप्रवास होता! 

विवेकानंदांनी आमंत्रण नसताना कसेबसे पैसे गोळा करून तेथे जाणे, म्हणजे खेड्यातील जत्रेत कुस्ती खेळणाऱ्या पहिलवानाने कोठेतरी ऑलिम्पिक सामने आहेत, असे ऐकून तेथे कुस्ती खेळायला जाण्यासारखे होते. सर्वधर्म 👍 परिषदेच्या स्वागत कक्षातून खिल्ली उडवून विवेकानंदांना परत पाठवले गेले होते. विवेकानंदांनी हे आमंत्रण कसे मिळवले हा एक विलक्षण प्रकार आहे..

ही सर्वधर्म परिषद ११ सप्टेंबर १८९३ रोजी सुरू झाली. ती १७ दिवस होती. आपणासमोर येते ते ११ सप्टेंबरला उद्घाटनाच्या दिवशी त्यांनी केलेले पाच मिनिटांचे भाषण. तेसुद्धा समोर येते विस्कळीत स्वरूपात. मात्र, या १७ दिवसांत विवेकानंद पुनः पुन्हा काय सांगत होते, ते ‘बोस्टन इव्हिनिंग ट्राॅन्स्क्रिप्ट’च्या ३० सप्टेंबरच्या अंकात आहे. ती बातमी त्यांच्या प्रतिनिधीने २३ सप्टेंबरला पाठवली आहे. ती अशी - *‘विवेकानंदांची भाषणे आकाशासारखी व्यापक स्वरूपाची आहेत. सर्व धर्मातील सर्वोत्कृष्ट तत्त्वांचा ज्यात समावेश आहे अशा विश्वधर्माची त्यांच्या मनात कल्पना आहे.’* 

२८ सप्टेंबर रोजी समारोपाच्या समारंभात दिलेल्या भाषणात त्यांनी सांगितले, *"सर्व धर्म एक आहेत. अध्यात्म म्हणजे पावित्र्य, चित्तशुद्धी, आणि दया. हे सर्व धर्मांचे मूलभूत आधार आहेत. माझा विश्वास आहे की, सर्व धर्मांच्या ध्वजांवर लवकरच लिहिले जाईल - संघर्ष नको. परस्परांना सहाय्य करा. एकमेकांना आत्मसात करा. विनाश करू नका. कलह नको. मैत्री हवी. शांती हवी."*

विवेकानंदांच्या या अशा मांडणीमुळे हिंदू धर्माने विवेकानंदांना पूर्णपणे नाकारले होते. २० जून १८९४ रोजी हरिदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवून त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, *"मी अमेरिकेत येऊन नऊ महिने पूर्ण झाले. मात्र अजूनही मी हिंदूंचा प्रतिनिधी आहे असे अमेरिकन लोकांना स्पष्ट सांगण्याचा शंकराचार्यांनी, हिंदू संघटनांनी वा हिंदू बांधवांनी काहीही प्रयत्न केला नाही. उलटपक्षी, हे लोक अमेरिकन लोकांना सांगत आहेत, की मी पक्का भोंदू माणूस असून, अमेरिकेत आल्यावर मी संन्याशाची वस्त्रे परिधान केली आहेत."*

हिंदू धर्म असे वागत होता यात हिंदू धर्माची अजिबात चूक नव्हती. मराठी माणसांना आवडेल अशा शब्दांत सांगायचे तर शाहू, फुले, आंबेडकर यांच्यापेक्षा अधिक भेदक अशी हिंदू धर्माची चिरफाड करत विवेकानंद उभे होते. १७ सप्टेंबर १८८९ रोजी पूज्य पादांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, *"माझी अगदी पूर्ण खात्री झाली आहे, की आपल्या देशातील प्राचीन मतांनुसार जाती विभाग हा वंशगत मानलेला आहे. आणि स्पार्टा देशातील लोकांनी तिथल्या गुलामांवर व अमेरिकेतील लोकांनी तेथील निग्रोंवर जेवढे अत्याचार केलेत, त्यापेक्षा अधिक अत्याचार आपण या देशातील शूद्रांवर केले आहेत. आपले न्यायमत सांगते, ब्रह्मज्ञ ऋषींची वाणी म्हणजेच वेद. या दृष्टीने आपले ऋषी हे सर्वज्ञ होत. मग आजचे विज्ञान साध्या साध्या नियमांबाबत त्यांना अज्ञ ठरवते त्याचे काय? त्यांचा सूर्य सिद्धांत सांगतो - पृथ्वी त्रिकोणी असून, ती वासुकीच्या मस्तकावर आहे. हे त्यांचे ज्ञान नाकारल्याशिवाय अज्ञानातून सुटका होणार नाही."*

जून १८९० मध्ये विवेकानंदांनी वराहनगर मठ सोडला व भटका संन्याशी म्हणून ते बाहेर पडले. पुढील तीन वर्षांत त्यांनी भारत उभा-आडवा पिंजून काढला. २२ ऑगस्ट १८९२ रोजी दिवाणजींना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, *"ज्यांच्या ४०० पिढ्यांनी वेद ही काय चीज आहे हे पाहिलेले नाही. ते पुरोहित आज देशाला वेद शिकवताहेत? देवा - ब्राह्मणांच्या रूपाने माझ्या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांपासून माझ्या देशाचे रक्षण कर!"*

२० ऑगस्ट १८९३ ला विवेकानंद सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेत पोहोचले. परिषदेला फक्त तीन आठवडे उरले होते. पेरूमल यांना पत्र पाठवून विवेकानंद सांगतात, *"हिंदू धर्माइतका इतर कोणताही धर्म कंठरवाने मानवाच्या महिम्याचा प्रचार करत नाही. परंतु, हिंदू धर्म गरीब व खालच्या जातीच्या लोकांना जेवढा पायाखाली तुडवतो, तितका जगातील इतर कोणताही धर्म तुडवत नाही."*

सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांना अद्भुत यश मिळाले. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांनी वराहनगर मठातील त्यांचा मित्र शशी - जो श्रीरामकृष्णांचा सर्वात आवडता होता म्हणून ज्याला रामकृष्णानंद म्हणतात - यांना १९ मार्च १८९४ रोजी पत्र पाठवून त्यांनी सांगितले, *"भारतभर उच्च जातींकडून खालच्या जातींवर होणारे भयावह घृणास्पद अत्याचार मी पाहिलेत. मंदिरांत शूद्रांना प्रवेश नाही. मात्र, मंदिरांत देवदासी बनवून स्त्रियांना नाचवले जाते आहे. जो गरीबांचे दु:ख दूर करत नाही. जो माणसाची देवता बनवत नाही. त्याला काय धर्म म्हणावे? आमचा धर्म हा ‘धर्म’ या नावाला तरी पात्र आहे का? या देशातील मोठमोठे शास्त्री-पंडित गेली दोन हजार वर्षे पाणी डाव्या बाजूने प्यावे, की उजव्या बाजूने, आणि गंध उभे लावावे, की आडवे असल्या महान प्रमेयांची चर्चा करत आहेत. त्या देशाची मग अधोगती होणार नाही, तर मग दुसरे काय होणार? या देशातील बहुसंख्य माणसे अर्धनग्न व अर्धपोटी आहेत. या देशातील दहा-वीस लाख साधू आणि काही लाख शिक्षित लोक कोट्यवधी गरीबांचे रक्त शोषत आहेत. हा काय देश आहे, की नरक? हा काय धर्म आहे, की हे आहे सैतानाचे तांडव?"*

मात्र, विवेकानंद केवळ हिंदू धर्मावर घणाघाती टीका करून थांबत नाहीत, तर ते अस्वस्थ होऊन हा देश या भयावह परिस्थितीत का पोचलाय याचाही विचार करताहेत. 

रामकृष्णानंदांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, *"मी बुद्धदेवांना सर्वाधिक मानतो. कारण वर्णव्यवस्था - जातिव्यवस्था हे या देशाच्या अवनतीचे एकमेव कारण आहे, हे त्यांनी सांगितलंय."*

दुसऱ्या एका पत्रात ते सांगताहेत, *"या धर्माने ज्यावेळी समुद्र प्रवास नाकारला आणि ‘म्लेंछ’ हा शब्द शोधून काढला, त्या क्षणी या देशाच्या अवनतीची सुरवात झाली."*

आणि नीटपणे विचार केला तर या सर्वांमागे फक्त एकच कारण आहे, हे अगदी खणखणीत शब्दांत ३ मार्च १८९४ रोजी सिंगारवेलू मुदलियार यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले. विवेकानंद सांगताहेत, *"सामाजिक गोष्टींच्या बाबतीत धर्माने ढवळाढवळ केली. ही धर्माची सर्वात मोठी चूक आहे. सामाजिक नियमांचा कर्ता होण्याचा धर्माला काहीही अधिकार नाही. धर्माचा संबंध केवळ आत्म्याशी आहे. त्याने सामाजिक क्षेत्रात अजिबात ढवळाढवळ करू नये. आतापर्यंत जे अनर्थ घडले. त्याचे एकमेव कारण धर्माने सामाजिक बाबतीत ढवळाढवळ केली, हे आहे."* 

धर्माने सामाजिक बाबतीत ढवळाढवळ केल्याने मानवी समाजाचे कसे अपरंपार नुकसान होते, हे त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले आहे. त्यातील दोन उदाहरणे महत्त्वाची आहेत. संमती वयाच्या कायद्याबद्दल चर्चा सुरू होती. त्यावेळी ब्रह्मानंदांना पत्र पाठवून विवेकानंदांनी सांगितले, *"आठ वर्षांच्या मुलीचा तीस वर्षांच्या घोडनवऱ्याशी विवाह होतोय. या विवाहाबद्दल आई-वडिलांना आनंद होतोय. आणि आम्ही याला विरोध केला, तर ‘तुम्ही आमचा धर्म बुडवत आहात’ अशी ओरड केली जाते. अरे, ज्यांना आपल्या मुली वयात येण्यापूर्वी तिला आई झालेली पाहण्याची घाई झालेली असते. आणि त्यासाठी जे शास्त्रीय स्पष्टीकरण देतात. त्यांना कसला आलाय धर्म? काही जण सांगतात मुस्लिम आक्रमकांपासून मुलींचे रक्षण करायला बालविवाह निर्माण झाले. अरे, आपण किती खोटे बोलणार आहोत? मी सर्व धर्मसूत्रे आणि ब्राह्मणग्रंथ अगदी बारकाईने वाचले आहेत. त्या सर्वांचा आदेश मुलगी लहान असताना तिचा विवाह करावा असा आहे. सर्व भाष्यकारांनी त्याची ग्वाही दिलेली आहे. धर्माने सामाजिक बाबतीत ढवळाढवळ करून दिलेल्या घृणास्पद गोष्टी ठामपणे नाकारण्याची वेळ आता आलेली आहे."*

गोहत्येबाबत विवेकानंद अधिक दाहकपणे सांगतात. बेलूर मठात विवेकानंदांना भेटावयास काही गोभक्त आले होते. भाकड गाईंसाठी ते पांजरपोळ चालवत होते. त्यांनी खूप पैसे या कार्यासाठी जमवले होते. विवेकानंद त्यांना म्हणाले, *"आता गाईंना विसरा. आज मध्य प्रदेशात माणसे भुकेने तडफडून मरताहेत. ते सर्व पैसे तिकडे पाठवा."* त्यावर ते सनातनी हिंदू विवेकानंदांना म्हणाले, *"स्वामी, तुम्ही सांगता ते चुकीचे आहे. आमचे धर्मग्रंथ सांगताहेत की, ती माणसे भुकेने तडफडून मरताहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केले होते. आपण त्यांचा विचार करावयाचे काही कारण नाही."* अस्वस्थ विवेकानंद त्यांना म्हणाले, *"ही रचना फारच सोपी आहे. मग आता त्या गाईंनाही विसरा. त्यांनीही गेल्या जन्मात पाप केलेले असणार!"* यावर ते गोभक्त म्हणाले, *"स्वामी, तुम्ही म्हणताय ते खरे. पण आपले धर्मग्रंथ सांगतात, की गाय ही आपली आई आहे. आणि आई कितीही वाईट असली, तरी आपण तिचे रक्षण करावयास हवे."* विवेकानंदांतील खट्याळ मुलगा आता जागा झाला होता. त्यांनी त्या गोभक्तांना नमस्कार केला आणि म्हणाले, *"आता निघा, तुमचे आई-वडील आज मला समजले!"* मात्र अस्वस्थ झालेल्या विवेकानंदांनी खिल्ली उडवून हा प्रश्न सोडलेला नाही. मालमदुरा येथे भाषण देताना त्यांनी सांगितले, *"या देशात एक काळ असा होता, की गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राह्मण हा ब्राह्मण होऊ शकत नव्हता. आणि आपल्या वेदांत तर सांगितलंय, की राजा किंवा फार मोठा ब्राह्मण घरी आला, तर गाय-बैल कापून त्यांच्या रुचकर मांसाचे जेवण त्याला द्या. मात्र, हा देश शेतीप्रधान आहे. गोवंश वाढला पाहिजे, म्हणून आपण ही धर्माज्ञा बदलली. आज परिस्थिती बदलली असेल, तर आपण पुन्हा त्यात बदल करावयास हवा."*

‘धर्म, त्याचा उद्देश आणि त्याची कार्यपद्धती’ या आपल्या निबंधात त्यांनी सांगितले, *"एखादी गोष्ट धर्मग्रंथाने सांगितलेली असेल वा फार मोठा धर्मगुरू सांगत असेल, मात्र ती तुमच्या विचारशक्तीला पटत नसेल, तर ती ठामपणे नाकारा. कारण परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वांत मोठी देणगी ही विचार करण्याची शक्ती । आहे. विचार न करता एखादी गोष्ट तुम्ही आंधळेपणाने स्वीकारता, तेव्हा तुम्ही खरे तर अगदी नकळत पशूच्या पातळीवर पोचता."*

धर्माने आपल्या मर्यादेत राहावे, हे विवेकानंद संयत शब्दांत आपल्या शिष्यांना पटवून देतात. मद्रासमधील शिष्यांना त्यांनी २४ जानेवारी १८९४ आणि १९ नोव्हेंबर १८९४ या दिवशी पत्रे लिहिलीत. या दोन्ही पत्रांत त्यांनी सांगितले, *"जीवन, विकास व सुख-शांती या सगळ्यांसाठी आवश्यक अशी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे विचार व आचार यांचे स्वातंत्र्य. ते जर नसेल तर राष्ट्र, मानव किंवा मानववंश यांचे पतन अटळ आहे. इतरांचे नुकसान होत नसेल, तर आपण काय खावे, कोणते कपडे घालावेत, कोणाशी विवाह करावा हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला हवा."*

*"हा हिंदू धर्म बदलणार नसेल; तर त्याच्याशी माझे काही देणेघेणे नाही."* हे विवेकानंदांनी ९ सप्टेंबर १८९५ रोजी त्यांचा मित्र अळसिंगा पेरूमल यांना पाठवलेल्या पत्रात सांगितलंय. ते लिहितात, *"फक्त सुशिक्षित हिंदूंमध्येच आढळून येणाऱ्या जात्यांध, धर्मभोळ्या, निर्दयी, दांभिक अशा हिंदुंपैकी एक बनून जगावे व मरावे म्हणून मी जन्माला आलेलो नाही."*

अलमबझार मठातील आपल्या गुरुबंधूंना विवेकानंदांनी २७ एप्रिल १८९६ रोजी पत्र लिहिले आहे. त्या पत्रात ते म्हणतात, *"आपले देव आता जुने झालेत. आपल्याला आता नवे देव, नवे वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे."*

ही परिस्थिती आपण बदलू अशी अंधुकशी आशा त्यांच्या मनात आहे. मे १८९६ मध्ये कु. अलबर्टा स्टर्जीस यांना पाठविलेल्या पत्रात ते सांगतात, *"मी लवकरच हिंदुस्थानात जात आहे. मला आपले कार्य तेथे चालू करता येईल का, हे मला पाहावयाचे आहे. हिंदुस्थान म्हणजे निष्क्रिय व पुराणप्रिय लोकांचा विशाल जमाव आहे. सगळी जुनी निर्जीव अनुष्ठाने म्हणजे केवळ जुन्या भोळसट समजुती आहेत. ती जिवंत ठेवण्यासाठी कशाला धडपड करावयाची? तेथे मला अगदी नवीन काहीतरी सुरू करावयाचे आहे. ते साधे, पण सामर्थ्यशाली असेल."*

अशा मांडणीमुळे आणि वागण्यामुळे ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखोबाराय यांना जे भोग भोगावे लागले. तेच विवेकानंदांनाही भोगावे लागले. जानेवारी १८९७ मध्ये विवेकानंद भारतात परतले. ते परत आल्यावर महा महोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्र संपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितले, *"हा माणूस शूद्र आहे. समुद्र प्रवास करून आलाय. प्रायश्चित्त देऊनही याला शुद्ध करता येणार नाही."* विवेकानंद कोलकत्याला पोचले तेव्हा 'बंगवासी’ने लिहिले.. *‘हा माणूस शूद्र आहे. याला संन्यास घेण्याचा अधिकार नाही.’* 

२८ फेब्रुवारी १८९८ रोजी विवेकानंद भगिनी निवेदितांना घेऊन दक्षिणेश्वराच्या मंदिरात श्रीरामकृष्ण जयंती साजरी करावयास गेले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. विवेकानदांना अवमानित होऊन निमूटपणे इतरत्र श्रीरामकृष्ण जयंती साजरी करावी लागली. १४ सप्टेंबर १८९९ रोजी लंडनमधील त्यांचे मित्र ई. टी. स्टर्डी यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलंय - *"भारतात पाय ठेवल्याबरोबर लोकांनी मला मुंडण करावयास लावले. कफनी घालावयास लावली. या सर्वांचा परिणाम म्हणून माझे मधुमेहासारखे जुने आजार बळावले आहेत. अर्थात, हे सर्व माझ्याच कर्माचे फळ आहे आणि त्यामुळे याबद्दल मला आनंद आहे. आता अनेक कारणांमुळे काही काळ तीव्र वेदना होत असल्या तरी आयुष्यातील एक मोठा अनुभवही मिळतो आहे. आता हा अनुभव या जन्मात उपयोगी येणार की पुढच्या जन्मी, एवढाच एक प्रश्न उरतो."*

विवेकानंदांनी बेलूर मठ स्थापन केला. त्यावेळी देशातील एकाही धनिकाने वा संस्थानिकाने एक रुपयाचीही मदत केली नाही. सारे पैसे हेनरिटा मुल्लर या त्यांच्या लंडनमधील मैत्रिणीने दिले. बेलूर मठाचे सभासद होताना धर्म, पंथ, जात, लिंग आणि राष्ट्रीयत्व विचारात घेतले जाणार नव्हते. सर्व माणसे एकसमान आहेत असे बेलूर मठ मानत होता. त्यामुळे हा मठ नाही. असा मठ असूच शकत नाही. हे विवेकानंदांचे आरामगृह आहे, असे म्हणून कोलकता महापालिकेने बेलूर मठावर भलामोठा कर बसवला.

वयाच्या ३९ व्या वर्षी विवेकानंदांचा अकल्पित, अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी कोलकत्यातील कोणत्याही वृत्तपत्राने त्यांच्या मृत्यूची साधी बातमीही छापली नाही. शोकसभेत सामील होण्यासाठी बेलूर मठाने कोलकता उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना बोलवले होते. दोघांनीही त्याला नकार दिला. कोलकता महापालिकेत श्रीरामकृष्णांच्या मृत्यूची नोंद आहे, परंतु विवेकानंदांच्या मृत्यूची नाही.

दत्तप्रसाद दाभोळकर 

( लेखक ज्येष्ठ संशोधक असून स्वामी विवेकानंदांच्या साहित्य - विचारांचे सापेक्षी अभ्यासक आहेत. )

Courtesy : Shekhar Sonalkar सर.

१२ जानेवारी १८६३_स्वामी_विवेकानंद_जन्मदिवस_विनम्र_अभिवादन

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 


 १२ जानेवारी इ.स.१८६३
#स्वामी_विवेकानंद_जन्मदिवस
कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. ते पुढे स्वामी विवेकानंद नावाने ओळखले जावू लागले त्यांचा आज जन्मदिवस. भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.

************************************************
हिंदू और मुसलमान
'इस देश के दो आँख हैं l

यां देशातील हिंदू आणि मुसलमान म्हणजे
यां देशाचे दोन डोळे आहेत.'

- स्वामी विवेकानंद

"ज्या ठिकाणी वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानव जातीला घेऊन जावयाचे आहे."

- स्वामी विवेकानंद 10 जून 1898

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...