इंदिरा गांधींनी प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा १९६९ साली महत्वाचा निर्णय घेतला.ठराविक उद्योगपतींसाठीच चालणाऱ्या देशातल्या १४ प्रमुख बँकांचे इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केले.
टाटांच्या अधिपत्याखाली चालणारी सेंट्रल बँक यापैकी सर्वात मोठी ज्यांत सुमारे चारशे कोटी रूपयांच्या ठेवी होत्या.तुलनेने सर्वात लहान बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. प्रा.व्ही.जी.काळे आणि डी.के.साठेंनी १९३५ साली पुण्यात सुरू केलेल्या या बँकेत जवळपास ७० कोटींच्या ठेवी होत्या,याखेरीज बिर्ला समूह त्याकाळी युनायटेड कमर्शिअल बँक चालवायचा तर डालमिया जैन यांच्याकडे पंजाब नॅशनल बँकेची सूत्रे होती.देना बँकेत
काही गुजराती उद्योगपतींचे हितसंबंध गुंतले होते.
सर्वांनाच राष्ट्रीयीकरणाच्या धडक निर्णयाचा झटका बसला.देशातल्या अग्रगण्य बँकांच्या तत्कालिन आर्थिक सर्वेक्षणानुसार १८८ संचालक बँका चालवायचे देशातल्या अन्य १४५२ कंपन्यांचेही संचालक होते.प्रचंड प्रमाणात खाजगी आणि अधिकार मिळवण्यासाठी बँकांचा बराच निधी सर्वांनी बिनदिक्कतपणे वापरला. बँकांची दारे आता उच्चवर्गाऐवजी जनसामान्यांसाठी खुली झाली.
संदर्भ : २४ अकबर रोड , पृष्ठ क्र.३६
लेखक : रशीद किदवाई.
© सत्यजित चव्हाण
No comments:
Post a Comment