आपला उद्धार इतर करणार नाहीत त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे.
"धार्मिकदृष्ट्या आपण जेवढी क्रांती केली आहे तेवढी क्रांती कोणत्याही अन्य समाजाने केलेली नाही, हे कोणालाही नाकारता येणार नाही.न्याय, नीती, समता, बंधुत्व यावर या हिंदु धर्मामध्ये भर नाही. मनुष्याला जाणाऱ्या उपाधी मात्र भरपूर आहेत. धर्माच्या नावाखाली आपल्याला जे विघातक ते आपण सर्व करीत होतो.आपण आता पूर्वीप्रमाणे भक्तीभावाने पोथ्या पुराणे वाचीत नाहीत. आपल्यातील मंत्रतंत्र, साधुसंत सर्व नामशेष झाले आहेत आणि त्यामुळे आपला समाज अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ दिसू लागला आहे राजकीय प्रगतीबद्दलही तोच प्रकार आहे. अत्यंत अल्प अशा काळामध्ये आपण राजकीय प्रगती करून घेतली आहे, तेवढी इतर कोणत्याही समाजाची झालेली नाही, हे प्रत्येकास मान्य करावे लागेल आपण फक्त त्यांची गलिच्छ कामे करण्यासाठी होतो आपला एकही अधिकारी नव्हता ज्यांची सावली घेण्यात येत नव्हती, जे राजकारणात अनाधिकारी ठरले होते ते अस्पृश्य लोक ब्राह्मणांच्या मांडीला मांडी लावून आज देशाच्या कारभारात लक्ष पुरवीत आहेत."!!!
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-२, पान नं. ३९४)
दि. २६ एप्रिल १९४२ रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
No comments:
Post a Comment