कलिंग युद्धाचा प्रभाव...
सम्राट अशोकाची गृह व विदेश नीती बौद्ध धम्माच्या आदर्शाने प्रेरित होती. सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर अशोकाने युद्ध केले, जे कलिंग युद्ध या नावाने प्रसिद्ध आहे. या युद्धात मोठ्या नरसंहार झाल्याने अशोकाचे मन व्यथित झाले. या युद्धामुळे बौद्ध भिक्खूंना मोठ्या प्रमाणात कष्ट उचलावे लागले. ज्यामुळे अशोक व्यथीत झाला. त्यामुळे अशोकाने जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांचा धम्माचा आचरण करून आपल्या राज्यात बौद्ध धम्माची शिकवण आणि प्रसार करण्यास सुरुवात केली. अशोकाने आपल्या अखंड भारतातील समुदायाला व सीमेवरील राज्यांना आपल्या आदर्शातमक विचारांनी प्रभावित केले. कलिंगच्या जनतेस अशोकाने सांगितले की त्यांनी राजास आपला पिता समजून त्याच्या आज्ञांचे पालन करावे व त्यावर विश्वास ठेवावा. त्याने अधिकाऱ्यांना आदेश दिला की, त्याच्या विचारांचा प्रचार सर्व प्रजेत करावा.
परकीय राज्यांना देखील अशोकाने सैनिकी विजयाने जिंकण्यापेक्षा आपल्या आदर्श विचारांनी जिंकण्याचे ठरवले. परक्या देशात सुद्धा त्याने मनुष्य व पशुंच्या कल्याणासाठी पावले उचलली.
त्याने पश्चिम आशिया व ग्रीक राज्यांत देखील आपले शांती दूत आणि बौद्ध भिक्खूसंघ पाठवले. या सर्व बाबी शिलालेखावरून आधारित आहेत. बौद्ध इतिहासानुसार, अशोकाने बौद्ध धम्माचा प्रचारासाठी आपले धम्मप्रसारक श्रीलंका व मध्य आशियात पाठवले. एका प्रबुद्ध शासकाच्या रूपात अशोकाने प्रचाराद्वारे आपले राजकीय प्रभावक्षेत्र वाढविले.
No comments:
Post a Comment