उद्योगक्षेत्रातील
गौरवशाली कामगिरीने भारताची मान जगात उंचावणारे उद्योजक पदमविभूषण रतन टाटा यांची प्राणज्योत
आज मावळली. यांच्या सारखी माणसं अमर व्हावीत, यांच्या शिवाय माणुसकीचा विश्वास कायम
होत नाही. अनेकांना श्रीमंत झाल्यानंतरही कसं असायला हवे हे सांगणारे तसेच चांगली माणसही
यशस्वी होतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पदमविभूषण रतन टाटा सर. आज जरी त्यांनी
जगाचा निरोप घेतला असला तरी ते सदैव भारतीयांच्या मनात जिवंत राहतील. त्यांचे नेक विचार,
साधेपणा आणि जगण्याची जीवन प्रणाली कायम स्मरणात राहावी, अजरामर व्हावी ही मनःपूर्वक
इच्छा!
नेहमीच सामाजिक जाणीव जपणाऱ्या पदमविभूषण रतनजींना भावपूर्ण श्रद्धांजली!
- यशवंत द. ओव्हाळ

No comments:
Post a Comment