चौथ्या श्रेणीत (सफाई कामगार) काम करणाऱ्या आलोक
मौर्या याने आपल्या पत्नीला जीवाचं रान करून शिकवलं आणि ज्योती मौर्या या त्याच्या
पत्नीला प्रांतीय नागरी सेवा अधीकारी (पी. सी. एस.) बनवलं आणि अधिकारी झाल्यावर स्वार्थापोटी
आपल्या पतीला नाकारले कारण काय तर म्हणे "मनीष दुबे सोबत प्रेम झालं " असल्या
प्रेमाला काय आग लावायची? ज्या प्रेमात पतिने केलेल्या उपकाराची, प्रेमाची आणि त्यागाची
जाणीव नाही. त्या प्रेमाला काय म्हणावं, जर समजा आलोकने हिला
शिकवलीच नसती तर ?? मग मनीषला हिच्या सोबत प्रेम झालं असतं का? शिक्षणाने माणूस सुसंस्कृत
होतो. मग याला सुसंस्कृत म्हणावं कि मूर्खपणा.
ज्योतीने मौर्या हिने आज दोन घरात आग लावली एक स्वतःच्या
आणि दुसरी मनीष दुबेच्या. दोघेही विवाहित आहेत. पण या अक्कलशून्य लोकांमुळे विवाहित
महिलेला शिकवावी कि नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.. चला शुक्र आहे कि बऱ्याच महिलांना
पती शिकवतात पण त्या असं काही करीत नाही.. अशा काहिक अक्कल शून्य लोकांमुळे अखंड महिलांवर
प्रश्न निर्माण होतो....

No comments:
Post a Comment