Thursday, 13 July 2023

प्रेमाला मर्यादा नसतात आणि बंधन ही. सीमा हैदर आणि सचिन प्रेम कथा


प्रेमाला मर्यादा नसतात आणि बंधन ही. अशाच एका आंतरराष्ट्रीय प्रेमाची कहाणी आज बहुतांशी चर्चित आहे. पाकिस्तानची सीमा गुलाम हैदार आणि भारताचा सचिन ठाकूर. प्रियसी आपल्या प्रेमासाठी चार मुलांसमवेत पाकिस्तान मधून भारतामध्ये आली. कसं आणि कुठे यायचं हे युट्युब ने सांगितलं आणि एक नवा इतिहास कायम झाला. 
सीमा मूळची पाकिस्तानची आपल्या चार मुलांना सोबत ती मायदेशी राहायची नवरा पैसे कामाविन्यासाठी विदेशात असायचा. नवरा बायको मधील दुरी कमी करण्यासाठी सीमाने मोबाईल मध्ये पपजी खेळायची. खेळता खेळता ती सचिनच्या संपर्कात आली आणि गेम पार्टनरचे रूपांतर प्रेमात झालं आणि सुरुवात ती  झाली नव्या पर्वाला. नेपाळ मध्ये मंदिर शादी झाल्यावर तयारी झाली भारत प्रवासाची. 
भारतात आल्यावर सीमाने हिंदू धर्म स्वीकारला आणि नवीन बंधनाने ती खुश हि आहे. प्रेम हे आंधळं असतं आणि प्रेमाला जात, धर्म, पंथ, भाषा आणि देशसीमा  कदापि अडवू शकत नाहीत कारण प्रेम हे कदापि कैद होऊ शकत नाही. प्रेम आजाद असतं प्रेमाला कैद करायला जाल ते अजून मजबूत होत. काहिक लोकांनी या प्रेमाला "गदर एक प्रेम कथा पार्ट ३" तर काहींनी तर सीमाला "आय एस आय एजंट" म्हणून घोषित केलं. 
वास्तविकता सीमा आणि सचिन दोघे हि खुश आहेत आणि सचिनच्या घरातल्यानी सीमा आणि तिच्या मुलांना स्वीकारलं आहे. मीडिया आणि लोक यान साठी हि एक आंतरराष्टीय प्रेमकथा आहे तसेच नवीन मसाला आहे. 
"प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं" हि कुसुमाग्रजांची कवितेची वास्तविकता आज नव्याने पाहावयास  मिळाली. 
- यशवंत द. ओव्हाळ

Saturday, 1 July 2023

आलोक मौर्या तू बरोबर आहेस पण तुझा विश्वास आज आडवा पडलाय... !

 


चौथ्या श्रेणीत (सफाई कामगार) काम करणाऱ्या आलोक मौर्या याने आपल्या पत्नीला जीवाचं रान करून शिकवलं आणि ज्योती मौर्या या त्याच्या पत्नीला प्रांतीय नागरी सेवा अधीकारी (पी. सी. एस.) बनवलं आणि अधिकारी झाल्यावर स्वार्थापोटी आपल्या पतीला नाकारले कारण काय तर म्हणे "मनीष दुबे सोबत प्रेम झालं " असल्या प्रेमाला काय आग लावायची? ज्या प्रेमात पतिने केलेल्या उपकाराची, प्रेमाची आणि त्यागाची जाणीव नाही. त्या प्रेमाला काय म्हणावं, जर समजा आलोकने हिला शिकवलीच नसती तर ?? मग मनीषला हिच्या सोबत प्रेम झालं असतं का? शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. मग याला सुसंस्कृत म्हणावं कि मूर्खपणा.

ज्योतीने मौर्या हिने आज दोन घरात आग लावली एक स्वतःच्या आणि दुसरी मनीष दुबेच्या. दोघेही विवाहित आहेत. पण या अक्कलशून्य लोकांमुळे विवाहित महिलेला शिकवावी कि नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.. चला शुक्र आहे कि बऱ्याच महिलांना पती शिकवतात पण त्या असं काही करीत नाही.. अशा काहिक अक्कल शून्य लोकांमुळे अखंड महिलांवर प्रश्न निर्माण होतो....


एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...