Saturday, 25 December 2021

_स्मृती जाळली,आता मनु प्रवृत्ती जाळणं हे आधुनिक समतामुल्य समाज निर्मितीसाठी काळाची गरज आहे..

*_स्मृती जाळली,आता मनु प्रवृत्ती जाळणं हे आधुनिक समतामुल्य समाज निर्मितीसाठी काळाची गरज आहे..!_*
                        
मनुस्मृती हा मनु नावाच्या भट ऋषीने लिहीलेला ग्रंथ होता? काय होते यात?
यात समाजाचे चार वर्ण होते म्हणजे वर्ण व्यवस्था होती.चार वर्णात स्री ही शुद्र म्हणुनच गणली जात होती स्रीयांवर असंख्य बंधने होती फक्त स्रियांवरच नाही तर समाजातील सर्वच लोकांनी त्या प्रमाणे वागायचे. ब्राम्हणा ना वेगळा न्याय,क्षत्रियांना वेगळा, शुद्रांना वेगळा असे वेगवेगळे नियम त्यात होते व ते अन्यायकारक होते महिला माहिती नसल्यामुळे हे सर्व  महिलांना माहीत व्हावे म्हणुन लिहीत आहे मनुस्मृतीत महिलांनी बालपणी तरुणपणी,किंवा म्हातारपणी सुध्दा कुठलेच काम स्वतंत्र पध्दतीने करु नये.महिलांनी बाल्य अवस्थेत पित्याच्या तरुणपणी नवऱ्याच्या व नवरा मेल्यानतंर मुलाच्या ताब्यात रहायचे.स्वंतत्र रहाण्याची ईच्छा ती करु शकत नव्हती.पती कितीही नालायक असला तरी त्याला देवच मानायचे.नवरा मेल्यावरही पुनर्विवाहा चा विचार करायचा नाही.असली बंधने पुरुषाला नव्हती. पुरुषांना दुसऱ्या विवाहाची परवानगी होती पण महिलेला नव्हती मनु म्हणतो पुरुषांना दोष देण्याचा स्रियांचा स्वभावधर्मच आहे.स्रियांच्या अंगी दुर्गुण असतात त्या विद्वान किंवा मुर्ख माणसाला वाम मार्गाला लावु शकतात.असले गलिच्छ आरोप या मनुने स्रियांवर लावले व त्या मनुस्मृतीच्या आधारे स्रियांना जोखडुन ठेवले. स्रीला स्वातंत्र नव्हते...

               आता मला शुद्र हा शब्द लिहावासा वाटत नाही तरीही लिहीत आहे कारण ते शब्द आमच्या डिक्शनरीत आता नाहीत.आणि अशी ही मनुस्मृती बाबासाहेबांनी २५ डिसेंबर ला जाळली म्हणुन तो दिवस महिला मुक्ती दिन म्हणुन पाळला जातो.

         डॉ.बाबासाहेबांने मनुस्मृती का जाळली.कारण ज्या धर्मग्रंथाने छत्रपती शिवराय महाराजांचा राज्यभिषेक नाकार ला ज्या मनुस्मृतीने महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला त्याच मनुस्मृतीचे दहन  रायगडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी केले.मनामनात क्रांतीची ज्योत शिवरायांनी चेतवली रायगडाच्या पायी भिमरायानं मनुस्मृती पेटवली.ज्या मनुस्मृतीने सर्वसामान्यांना जनावरां सारखे वागवले चातुर्वर्ण व वर्ग व्यवस्था जोपासत जाती भेद मोठ्या प्रमाणात वाढवला व पोसला.इतकेच काय तर ज्या छत्रपती शिवरायांनी अठरापगड समाजाला एकत्र करुन रयतेच्या स्वप्नातील शिव  स्वराज्य स्थापन केले.
अशा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेका ला वैदिक ब्राम्हणांनी मनुस्मृतीच्या सहाय्याने विरोध करुन छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्याच अपमानाचा बदला  डॉ बाबासाहेब आंबेडकरानी प्रथमतः रायगडावर जाऊन शिव समाधीस अभिवादन करुन शिवाजी महाराज की जय,शाहु महाराज की जय अशा घोषणा देऊन नंतर रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे जाहीर रित्या मनुस्मृती हा वैदिक ग्रंथ जाळुन मनुवाद्यांच्या काळजाचा थरकाप उडवला.धर्म अंधश्रध्दा व कर्मकांडात गुंतवून मराठा बहुजनांना मानसिक व सामाजिक गुलामगिरीत अडकून ठेवणाऱ्या कधी काळी धर्म भेद जातभेद न मानता एकसंघपणे राहणाऱ्या मानवसमूहा मध्ये भेदाभेद करून जातीव्यवस्था निर्माणकरणाऱ्या सर्व स्त्री जातीला शूद्र मानणाऱ्या,ज्या मनूस्मृतीने संभाजी राजांना हालहाल करून मारले,ज्या मनूस्मृतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबांना शूद्र म्हणून हिनवले.ज्या मनूस्मृतीने बाबासाहेबांना अस्पृश्य म्हणून वर्गाबाहेर बसवले.
मनूस्मृती मानसिक गुलामी लादणाऱ्या व गुलामगिरी करणाऱ्यात आजही जिवंत आहे.समाज हितासाठी मराठा बहुजनांच्या सर्वांगीणप्रगतीसाठी तिला जाळलेच पाहिजे...

 अरे बघा त्या जळलेल्या मनुस्मृतीच्या राखेतून,
पुन्हा डोकावतोय मनू
त्याला वेळीच ठेचला पाहिजे..

बाबासाहेबांनी पेटवलेली क्रांतीची मशाल,
विझू देऊ नका बंधू-भगिनीनों..

पुन्हा एकदा लावावीच 
मनुच्या बुडाखाली आग

 मनुस्म्रुती  मानवतेला कलंक होती तीचे सार्वजनिकपणे दहन करुन ईथल्या गुलांमांची गुलामी मोडीत ज्यांनी काढली त्या महामानव विश्वरत्न  क्रांतीसुर्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम..।

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...