Sunday, 28 November 2021

भारतीय संविधान चिरायू होवो


 'आम्ही भारताचे लोक '

हिच आपली खरीखुरी ओळख. 

हिंदू, मुस्लिम, शीख, जैन,

बौद्ध,ख्रिश्चन,पारशी

यापेक्षाही

मी प्रथम भारतीय आहे

हे भान सर्वश्रेष्ठ आहे.


यातच आपले आणि

आपल्या पुढील पिढ्याचें 

भवितव्य सुखी आणि

सुरक्षित आहे.


धर्मशास्त्रानुसार 

वर्गात बाहेर बसविण्यात आलेला विद्यार्थी,

या संविधानाचा

शिल्पकार आहे.


फक्त माणूस आणि माणुसकी

यांच्याशीच नातं सांगणारं 

भारतीय संविधान चिरायू होवो.


No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...